शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
3
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
4
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
5
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
6
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
7
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
8
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
9
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
10
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
15
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
16
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
17
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
18
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
19
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
20
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

नागभीड बाजार समितीत भाजपाचे वर्चस्व

By admin | Updated: March 7, 2017 00:39 IST

नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपचे बाजार समितीवर १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत.

काँग्रेस तीन तर अपक्ष एक : १८ पैकी भाजपाचे १५ संचालक विजयीनागभीड : नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपचे बाजार समितीवर १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत. या बाजार समितीची रविवारी निवडणूक घेण्यात आली आणि आज सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. उल्लेखनीय असे की या बाजार समितीवर भाजपाचे ६ संचालक आधिच अविरोध निवडून आले होते.सोसायटी गटाच्या सर्व साधारण प्रवर्गातून आधिच अविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अवेश खाँ पठाण, गणेश तर्वेकर, नागो खोकले, मनोहर चौधरी, आनंद कोरे, विलास मोहुर्ले (सर्व भाजप) आणि जनार्दन खंडाळे (काँग्रेस) यांचा समावेश आहे. सेवा सहकारी गटातील महिला प्रवर्गातून रागिणी दिगंबर पाटील गुरुपुडे, शशिकला श्रीराम माटे, या गटाच्या इतर मागास वर्गीय प्रवर्गातून रमेश गणपत बोरकर तर विमाप्र प्रवर्गातून चंद्रशेखर श्रीधर विगम निवडून आले आहेत.ग्रामपंचायत गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गातून भैय्या रघुनाथ गिरडकर आणि अजय दयाराम देवाडे विजयी झाले आहेत. या गटाच्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राहुल सदाशिव रामटेके तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून दीपक पुनाजी भेंडारे निवडून आले. अडते व्यापारी मतदार संघातून विजय तुळशिराम येरणे आणि मुर्लीधर वारलू श्रीरसागर यांचा विजय झाला आहे. हमाल मापारी मतदार संघातून धनराज गोविंदा ढोक यांचा विजय झाला. ही मतमोजणी येथील राजीव गांधी सभागृहात करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ब्रह्मपुरीचे सहायक निबंधक सुभाष फुटाने यांनी काम पाहिले. अनिल उपासे, एस. डी. मेश्राम आणि एस. बी. सहारे यांनी त्यांना सहकार्य केले. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला. (तालुका प्रतिनिधी)तब्बल आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या बाजार समितीची निवडणूक झाल्याने सर्वाचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले होते. प्रारंभी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचा गट काँग्रेससोबत बसेल, अशी चर्चा रंगली होती. पण नामांकन परत घेण्याच्या दिवशीपर्यंत चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया व गजानन पाथोडे यांच्यात मनोमिलन झाल्याने या निवडणुकीने भाजपच्या बाजूनेच वळण घेतले होते. एवढेच नाही तर भाजप समर्थित पॅनलचा विजय पक्का मानला जात होता.