शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

कोट्यवधीची उधळपट्टी रस्ते मात्र ‘जैसे थे’

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे.

रत्नाकर चटप - नांदाफाटाऔद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करताना दिसते. मात्र प्रत्यक्षात दोन-तीन वर्ष लोटूनही रस्त्यावरील खड्डे मात्र कायमच आहे. त्यामुळे सदर विभागाचे काम केवळ कागदावरच दिसून येत आहे.तालुक्यातील भोयगाव- कवठाळा, भोयगाव- गाडेगाव, सांगोडा- हिरापूर- आवारपूर, अंतरगाव, नारंडा, नांदाफाटा, गडचांदूर, गडचांदूर- कोरपना, गडचांदूर- देवाडा, गडचांदूर- वनोजा, गडचांदूर - राजुरा आदी मुख्य मार्गावर संबंधित विभागाअंतर्गत काम करणारे कंत्राटदार कामे करीत आहे. मात्र कामात दर्जा नसल्याची ओरड नागरिकांची आहे. काही रस्त्यांवर केवळ मुरुम टाकून रस्त्यांची डागडूजी केली आहे. रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर संबंधित विभागाकडे देखभालीची जबाबदारी असते. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र कामात पारदर्शकता नसल्याने प्रवाशांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. आजमितीला सिमेंट कंपन्यांकडे जाणाऱ्या गडचांदूर- नांदाफाटा, हिरापूर- वनोजा, कोरपना- गडचांदूर, भोयगाव- गडचांदूर मार्गाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हेच खड्डे जिवघेणे ठरत आहे. आवारपूर- हिरापूर मार्गावरुन अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हिच अवस्था तालुक्यातील अन्य मार्गाची झाली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचे कामे केल्याचा कांगावा करत करीत आहे. मात्र रस्त्याकडे बघितल्यास हाच काय विकास, अशा प्रतिक्रिया आता जनमानसातून येत आहे. कोरपना - गडचांदूर मार्गावर सोनुर्ली गावाजवळ रस्त्याच्या कडा खचलेल्या आहे. यामुळे याआधी अनेक प्रवाशांचा अपघात होऊन मृत्यू झाला. आताही अधूनमधून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभाग कामे झाल्याचा कागदोपत्री पुरावा देत असले तरी रस्त्यांवरचे खड्डे मात्र बुजलेले नाही. एकाच मार्गावर वारंवार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. यात काही भागातील चार- दोन खड्डे बुजवून अर्ध्यावरच कामे रखडलेले आहे. त्यामुळे कामे झाली कुठे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.