शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची उधळपट्टी रस्ते मात्र ‘जैसे थे’

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे.

रत्नाकर चटप - नांदाफाटाऔद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करताना दिसते. मात्र प्रत्यक्षात दोन-तीन वर्ष लोटूनही रस्त्यावरील खड्डे मात्र कायमच आहे. त्यामुळे सदर विभागाचे काम केवळ कागदावरच दिसून येत आहे.तालुक्यातील भोयगाव- कवठाळा, भोयगाव- गाडेगाव, सांगोडा- हिरापूर- आवारपूर, अंतरगाव, नारंडा, नांदाफाटा, गडचांदूर, गडचांदूर- कोरपना, गडचांदूर- देवाडा, गडचांदूर- वनोजा, गडचांदूर - राजुरा आदी मुख्य मार्गावर संबंधित विभागाअंतर्गत काम करणारे कंत्राटदार कामे करीत आहे. मात्र कामात दर्जा नसल्याची ओरड नागरिकांची आहे. काही रस्त्यांवर केवळ मुरुम टाकून रस्त्यांची डागडूजी केली आहे. रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर संबंधित विभागाकडे देखभालीची जबाबदारी असते. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र कामात पारदर्शकता नसल्याने प्रवाशांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. आजमितीला सिमेंट कंपन्यांकडे जाणाऱ्या गडचांदूर- नांदाफाटा, हिरापूर- वनोजा, कोरपना- गडचांदूर, भोयगाव- गडचांदूर मार्गाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हेच खड्डे जिवघेणे ठरत आहे. आवारपूर- हिरापूर मार्गावरुन अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हिच अवस्था तालुक्यातील अन्य मार्गाची झाली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचे कामे केल्याचा कांगावा करत करीत आहे. मात्र रस्त्याकडे बघितल्यास हाच काय विकास, अशा प्रतिक्रिया आता जनमानसातून येत आहे. कोरपना - गडचांदूर मार्गावर सोनुर्ली गावाजवळ रस्त्याच्या कडा खचलेल्या आहे. यामुळे याआधी अनेक प्रवाशांचा अपघात होऊन मृत्यू झाला. आताही अधूनमधून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभाग कामे झाल्याचा कागदोपत्री पुरावा देत असले तरी रस्त्यांवरचे खड्डे मात्र बुजलेले नाही. एकाच मार्गावर वारंवार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. यात काही भागातील चार- दोन खड्डे बुजवून अर्ध्यावरच कामे रखडलेले आहे. त्यामुळे कामे झाली कुठे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.