सरपंच सुधाकर रोहणकर यांचा सत्कार
भद्रावती : कृषी वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्व व उद्घाटन सोहळा फेसबुक लाइव्ह कार्यक्रमाद्वारे पार पडला.
भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत भटाळी ही १०० टक्के कृषी वीजबिल भरणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली.
भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांचा मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ सुनील देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरपंच सुधाकर रोहणकर यांनी सप्टेंबर २०२० च्या चालू कृषी वीजबिलाचा भरणा करण्यासाठी गावातील कृषी पंपधारकांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार भटाळी गावातील कृषी पंपधारकांनी चालू बिलाचा भरणा केला होता.
सत्कार कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवडे, कार्यकारी अभियंता पारस खानेवाला, उपकार्यकारी अभियंता सचिन बदखल, श्रीकांत खरकाटे उपस्थित होते.