शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

भद्रावती बाजार समिती डबघाईस

By admin | Updated: January 22, 2015 00:52 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वत:च्या स्वार्थासाठी काम करीत असल्याने बाजार समिती डबघाईस आली आहे.

भद्रावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वत:च्या स्वार्थासाठी काम करीत असल्याने बाजार समिती डबघाईस आली आहे. ही बाजार समिती नजीकच्या बाजार समितीमध्ये विलीनीकरण करावी, असे पत्र पणन संचालकाने देवून सुद्धा विलीनीकरण न केल्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आल्याचा आरोप बाजार समितीत कार्यरत कर्मचाऱ्यांनी केला आहे.भद्रावती बाजार समितीची स्थापना ५ फेब्रुवारी १९९१ ला झाली. भाड्याच्या जागेत सुरू झालेली ही बाजार समिती सुरुवातीच्या काही वर्षात चांगलीच प्रगतीपथावर होती. परंतु, येथे कार्यरत सचिव मधुकर पारखी यांनी बाजार समितीचे उत्पन्न आपल्या खिशात टाकण्याकरिता नियोजन पद्धतीने बाजार समितीला संपविले, असा आरोप कार्यरत कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम व कार्यालयीन जमा रक्कम सन २००४ ते २००८ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या खाते पुस्तिकेत जमा करावयास पाहिजे होती. परंतु, ती अजूनपर्यंत जमा करण्यात आली नाही. काही कर्मचाऱ्यांची मुदत ठेवीची ८५ हजार ८०० एवढी रक्कम २००६ मध्ये प्रशासकीय कार्यकाळात सचिवाने परस्पर काढून टाकण्याचा आरोप सुद्धा कर्मचाऱ्यांनी केला आहे. फेब्रुवारी २०१४ पासून कर्मचाऱ्यांना वेतन देणे बंद असल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. आर्थिक तंगीमुळे मुलांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आर्थिक संतुलन ढासळले आहे. अशा स्थितीत जीवीतास काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सचिव पारखी यांची राहील, असेही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी याची तक्रार पणन संचालक पूणे, विभागीय सहनिबंधक नागपूर, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्याकडे केली आहे. सचिवाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुचवूनही सचिवांनी वेतन दिले नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)बाजार समितीच्या मालकीची एकमेव असलेली किलोणी येथील जिनींगची जागा अत्यल्प किंमतीत खासगी खरेदीदारांना विकली. वास्तविक पाहता ही जागा कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत गेली होती. या जागेबदल्यात कृउबा समितीने मुख्य मार्गावरील सात एकर जागा एम्टा कंपनीला मागितली असती तर शासनाकडून अनुदान प्राप्त करून बाजार समितीला पूर्नजीवन मिळाले असते. सचिव पारखी हे बाजार समितीच्या फायद्यापेक्षा स्वत:चा फायदा पाहत असल्याने आज आम्हाला भद्रावती सोडून वरोरा कृ.उ.बा. समितीमध्ये धान्य खरेदीचा व्यापार करावा लागत आहे.- मनीष सारडा, संचालक व व्यापारी कृउबास भद्रावतीभद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक स्त्रोत कमी झालेला आहे. बाजार समितीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कमी उत्पन्नामुळे होऊ शकत नाही. ही कृउबा समिती विलीनीकरण करण्यासंदर्भात पणन संचालकाचे पत्र प्राप्त झाले असून २३ जानेवारीला होणाऱ्या संचालकांच्या मासीक सभेत विलीनीकरणाचा ठराव घेण्यात येत आहे. बाजार समितीला एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत आणण्यास सचिव मधुकर पारखी जबाबदार आहे. - आण्याजी लांबटअध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीबाजार समितीची आर्थिक स्थिती पाहता ही बाजार समिती वरोरा कृउबा समितीमध्ये विलीन करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्यासह माझ्या कर्मचाऱ्यांचा एक वर्षापासून वेतन न झाल्याने आमची सर्वांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. विलीनीकरणाला संचालक मंडळाचा विरोध आहे. विलीनीकरण केल्यास आपले पद संपुष्टात येतील, अशी त्यांना भिती आहे. केवळ आपले पदे टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक समस्येकडे त्यांचे लक्ष जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे.- मधुकर पारखी,सचिव, कृउबास समिती भद्रावतीबाजार समितीची अशी अवस्था आणण्यास कारणीभूत असलेल्या सचिवाने परवानाधारक व विना परवानाधारक व्यापाऱ्यांकडून स्वत: सचिवच पैशाची वसुली करीत आहे. त्यामुळे समितीच्या उत्पन्नाला बाधा निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील मालाची खरेदी परस्पर होत असल्याने व मार्केटमध्ये माल येत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी समितीच्या बाजारातील खरेदी बंद केली. याकरिता बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळ कारणीभूत आहे.- मारोती गायकवाड,व्यापारी, चंदनखेडा