शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! पथदिव्यांचे देयक न भरल्यास सरपंच व सचिवाला धरणार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:33 IST

कोरपना(चंद्रपूर) : स्वनिधी व १५ वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील विजेच्या दिव्यांची वीजबिलाची रक्कम भरण्याकरिता ग्रामपंचायतींना सूचना देण्यात ...

कोरपना(चंद्रपूर) : स्वनिधी व १५ वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील विजेच्या दिव्यांची वीजबिलाची रक्कम भरण्याकरिता ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. ही वीज बिले भरण्यास हयगय करण्यात आल्यास सरपंच व सचिवांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून आदेश धडकले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. शासनाकडून १४ व्या वित्त आयोगातून महावितरणला काही प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. याशिवाय महावितरणने मार्च २०२१ पर्यंत ग्रामपंचायतींच्या रस्त्यावरील विजेच्या दिव्यांची वीज बिलाची थकीत रक्कम अदा करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. ‘महावितरण’च्या मागणीच्या अनुषंगाने थकबाकीच्या रकमेबाबत संपूर्ण ताळमेळ घेणे आवश्यक असल्याने अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीमार्फत संपूर्ण थकबाकीबाबत ताळमेळ घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांवरील थकीत वीज देयकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

तूर्तास ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची चालू बिलाचा भरणा स्वनिधीतून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे करावा. त्यासंदर्भात काही दिरंगाई झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची नियमित विद्युत देयके वेळेवर भरावीत, अशा सूचना राज्याचे उपसचिव तथा वित्त नियंत्रक प्रवीण जैन यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

शेकडो ग्रामपंचायतींच्या स्वनिधीमध्ये ठणठणाट

२०२० व २०२१ या दोन्ही वर्षी ऐन मार्च महिन्यात कोरोनाने डोके वर काढल्याने संचारबंदीमुळे ग्रामपंचायतींची करवसुली होऊ शकली नाही. उत्पन्नाचा स्त्रोत असलेले अनेक ग्रामपंचायतींचे लाखो रुपये कर स्वरूपात थकीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या स्वनिधीमध्ये पैशांचा ठणठणाट आहे. आधीच कर्मचाऱ्यांचे पगार, साफसफाई, गटार स्वच्छता व लाईटची व्यवस्था करणे ग्रामपंचायतींना कठीण झाले आहे. त्यातच या संकटाच्या काळात पथदिव्यांची वीज देयके स्वनिधीतून भरण्याच्या सूचनावजा आदेश देण्यात आल्याने ग्रामपंचायतींचा वाली कोण? हा गंभीर प्रश्न ग्रामीण नेतृत्व करणाऱ्या सरपंचांना पडला आहे.