शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवार तसेच रविवार विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवार तसेच रविवार विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लाॅकडाऊनला सामान्य नागिरकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरे, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक सध्या व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्या चिंताजनक वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात खाटाही मिळत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, लाॅकडाऊनला काही व्यावसायिकांचा विरोध आहे, तर लोकप्रतिनिधीही सावध भूमिका घेत आहे. लाॅकडाऊन झाल्यास सर्वांचेच नुकसान होणार असून, रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी लाॅकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी हात पुढे करीत गरीब तसेच गरजूंना विविध प्रकारे मदत केली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे या संस्थाही आता गरिबांच्या मदतीला येतील, असे चित्र नाही. लाॅकडाऊन केल्यास लहान व्यावसायिक, मजूर वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र गरीब तसेच सामान्य नागरिक कोरोनाने मरण्यापेक्षा अडचणीत दिवस काढण्याच्या मानसिकतेत आहे.

बाॅक्स

लाॅकडाऊनमध्ये सूट द्यावी

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मात्र लाॅकडाऊन यावर पर्याय नाही. जर शासनाला लाॅकडाऊन करायचा असेल तर जरूर करावा. मात्र व्यावसायिकांना काही वेळासाठी का होईना व्यवसाय करण्यासाठी सूट द्यावी, अशी मागणीही काही व्यावसायिकांकडून केली जात आहे.

बाॅख्स

ग्रामीण भागातही दहशत

कोरोनाने आपले पाय घट्ट रोवणे सुरू केले आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण वाढत आहे. बहुतांश गावात आता कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. मागील वर्षी बहुतांश ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्ण नव्हते. मात्र यावर्षी परिस्थिती चिंताजनक असून, गावातही मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढत आहे.

बाॅक्स

काय म्हणतात नागरिक.......

मागील वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे गरीब, गरजूंना दिलासा मिळाला. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. अनेकांचा जीवही गेला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासन जर लाॅकडाऊन करत असेल तर त्याचा फायदाच होणार आहे. काही नागरिकांना यामुळे फटका बसेल. मात्र संकटापुढे तो कमीच असेल.

-मनोहर मिस्त्री

चंद्रपूर

कोट

लाॅकडाऊन केल्यास सर्वांचेच मोठे नुकसान होणार आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णालयात खाटा उपलब्ध नाही. उपचारासाठी धावाधाव होत आहे. आरोग्य प्रशासनावर आता ताण पडत आहे. अशास्थितीत लाॅकडाऊन केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे.

-रोहित ठाकूर

चंद्रपूर