शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

बा पावसा का रुसलास ? : धरणीमातेला हिरवा शालू कसा नेसवणार!

By admin | Updated: July 16, 2015 01:17 IST

जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात.

बळीराजाचे डोळे आभाळाकडे !चंद्रपूर : जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व पेरण्या कडाक्याच्या उन्हामुळे करपू लागल्या आहेत. बळीराजाचे अश्रूभरले डोळे एकटक आभाळाकडे लागले आहे.आधीच शेतकरी महागाई, कर्ज यामुळे खचून गेला आहे. यंदा तरी निसर्ग साथ देईल अशा आशेत शेतकऱ्यांनी प्रारंभी तीन दिवस पाऊस पडल्यानंतर मोठ्या जोमात पेरण्या आटोपल्या. मात्र शेतकऱ्यांना नेहमीच दगा देणाऱ्या पावसाने यावेळीदेखील दगाच दिला आहे. अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना खडतर दिवस पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाच्या सरीने रुजलेल्या बियांना चांगलेच अंकूर फुटले. मात्र मातीतून उगविलेल्या रोपाची अर्धा फूट उंचीही वाढली नाही आणि पावसाने दडी मारली. मागील २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. ढगाळ वातावरण व आभाळात कडकडाट होतो. मात्र पाऊस पडत नाही. आज पाऊस पडेल, उद्या पडेल, या आशेवर शेतकरी एक एक दिवस चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे. दररोज देवदेवतांना साकडे घालत आहे. मात्र देवदेवतांसह निसर्गही शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यातील १५ टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा असतील. उर्वरित शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहेत. मात्र निसर्ग दगा देत असल्याने या शेतकऱ्यांच्या पेरण्या करपत चालल्या आहेत. डोळ्यादेखत पेरण्या मातीमोल होत असतानाही शेतकऱ्यांना काहीही करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये तीन दिवस आलेल्या पावसानंतरही पेरण्या केल्या नाही. आणखी पाऊस पडेल तेव्हा पेरण्या करू, अशा मानसिकतेत हे शेतकरी होते. मात्र त्यानंतर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जुलै महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाही. आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. त्यानंतरही पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळ निश्चित मानला जात आहे. (शहर प्रतिनिधी)पहाडावरील पिके करपलीमाणिकगड पहाडावर सिंचनाच्या सुविधा नाही. पावसाचे पाणीच शेतकऱ्यांचा आधार आहे. येथील शेतकरी खरीप हंगामावरच अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूल, उडीद या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी जूनमध्येच केली. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके करपून जात आहे. येथील शेतकरी गरीब आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणांची खरेदी कुठून करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी विभागाचे अद्याप सर्वेक्षण नाहीमागील २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके सुकत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष नाही. कृषी विभागाने तर या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही यंत्रणेने अद्याप दाखविले नाही.उन्हाची काहिलीही वाढलीजुलै महिना म्हणजे पावसाचा महिना. या महिन्यात खरंतर अनेक ठिकाणी नदीनाले भरून पूरपरिस्थिती निर्माण होते. मात्र यावेळी या महिन्यात पावसाचा थेंबही नाही. उलट उन्हाची काहिली वाढून नागरिकांना उन्हाळ्यासारखे जाणवू लागले आहे. काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू झाले आहे.