शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बा पावसा का रुसलास ? : धरणीमातेला हिरवा शालू कसा नेसवणार!

By admin | Updated: July 16, 2015 01:17 IST

जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात.

बळीराजाचे डोळे आभाळाकडे !चंद्रपूर : जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व पेरण्या कडाक्याच्या उन्हामुळे करपू लागल्या आहेत. बळीराजाचे अश्रूभरले डोळे एकटक आभाळाकडे लागले आहे.आधीच शेतकरी महागाई, कर्ज यामुळे खचून गेला आहे. यंदा तरी निसर्ग साथ देईल अशा आशेत शेतकऱ्यांनी प्रारंभी तीन दिवस पाऊस पडल्यानंतर मोठ्या जोमात पेरण्या आटोपल्या. मात्र शेतकऱ्यांना नेहमीच दगा देणाऱ्या पावसाने यावेळीदेखील दगाच दिला आहे. अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना खडतर दिवस पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाच्या सरीने रुजलेल्या बियांना चांगलेच अंकूर फुटले. मात्र मातीतून उगविलेल्या रोपाची अर्धा फूट उंचीही वाढली नाही आणि पावसाने दडी मारली. मागील २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. ढगाळ वातावरण व आभाळात कडकडाट होतो. मात्र पाऊस पडत नाही. आज पाऊस पडेल, उद्या पडेल, या आशेवर शेतकरी एक एक दिवस चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे. दररोज देवदेवतांना साकडे घालत आहे. मात्र देवदेवतांसह निसर्गही शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यातील १५ टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा असतील. उर्वरित शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहेत. मात्र निसर्ग दगा देत असल्याने या शेतकऱ्यांच्या पेरण्या करपत चालल्या आहेत. डोळ्यादेखत पेरण्या मातीमोल होत असतानाही शेतकऱ्यांना काहीही करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये तीन दिवस आलेल्या पावसानंतरही पेरण्या केल्या नाही. आणखी पाऊस पडेल तेव्हा पेरण्या करू, अशा मानसिकतेत हे शेतकरी होते. मात्र त्यानंतर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जुलै महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाही. आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. त्यानंतरही पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळ निश्चित मानला जात आहे. (शहर प्रतिनिधी)पहाडावरील पिके करपलीमाणिकगड पहाडावर सिंचनाच्या सुविधा नाही. पावसाचे पाणीच शेतकऱ्यांचा आधार आहे. येथील शेतकरी खरीप हंगामावरच अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूल, उडीद या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी जूनमध्येच केली. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके करपून जात आहे. येथील शेतकरी गरीब आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणांची खरेदी कुठून करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी विभागाचे अद्याप सर्वेक्षण नाहीमागील २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके सुकत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष नाही. कृषी विभागाने तर या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही यंत्रणेने अद्याप दाखविले नाही.उन्हाची काहिलीही वाढलीजुलै महिना म्हणजे पावसाचा महिना. या महिन्यात खरंतर अनेक ठिकाणी नदीनाले भरून पूरपरिस्थिती निर्माण होते. मात्र यावेळी या महिन्यात पावसाचा थेंबही नाही. उलट उन्हाची काहिली वाढून नागरिकांना उन्हाळ्यासारखे जाणवू लागले आहे. काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू झाले आहे.