शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

पुनर्वसन रखडल्याने बरांजला धोका

By admin | Updated: August 3, 2014 23:16 IST

भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा

प्रशासन गंभीर नाही : संपूर्ण गावच नष्ट होण्याची भीतीविनायक येसेकर - भद्रावतीभद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा परिसर व मातीचे ढिगारे असल्याने दरवर्षी या गावाला पुराचा वेढा असतो. अतिवृष्टी झाली तर हे संपूर्ण गाव नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे या गावाचे तात्काळ पुनर्वसन करा, अशी मागणी आहे. मात्र अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्याने बरांजवरील जीवघेणा धोका कायम आहे. बरांज (मोकासा) येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे निवेदन देत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासन त्यांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या गावाला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा गावकरी किती धोक्यात जीव जगत आहे, हे दिसून आले. एम्टा या कोळसा खाणीच्या दुसऱ्या फेसचे जोरात काम चालू आहे. पहिल्या फेसच्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याने या गावाला आधीच वेढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण गावच पाण्याने वेढले होते. त्यावेळी प्रशासनाने त्यांना बाहेर काढण्याकरिता स्वयंचलीत बोटीचा वापर केला होता. यावर्षी दुसऱ्या फेसचे उत्खनन सुरू झाले असून खाणीतून निघणाऱ्या मातीचा गावाला लागूनच दुसऱ्या भागाने डोंगर उभा केला जात आहे. हे उत्खनन गावातील एक रस्ता सोडता चारही बाजूने सुरु आहे. याठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व नवीन वस्ती खाणीच्या अगदी काठावर आल्याने भविष्यात खाणीची दरड कोसळल्यास अख्खे गावच खाणीत कोसळून मोठी प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते. गावाच्या इतर भागाकडे उंच मातीचे ढिगारे असल्याने तेसुद्धा अती पावसाने गावावर कोसळून गाव ढिगाऱ्याखाली गाडले जाऊ शकते, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. अविवृष्टी झाली तर पुराचा जोर वाढून गाव बुडण्याची शक्यताही आहे. खुद्द गावकऱ्यांनीच ही भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. मात्र काहीही उपयोग झाला नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या गावाचे सुरक्षित जागी पुनर्वसन करावे, अशी आर्त मागणी गावकरी करीत आहेत. या संदर्भात कर्नाटका एम्टामधील एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मातीच्या ढिगाऱ्यांच्या बाजुने कंपनीने मोठे नाले केले असल्याचे सांगितले.