शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

बँक अधिकाऱ्यांची डिजिधन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:40 IST

केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, ...

आशुतोष सलील : नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावेचंद्रपूर : केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केले. बँक अधिकारी व नागरिकांसाठी डिजिधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सलील म्हणाले की, चलनांचा वापर न करता कॅशलेस व्यवहार करण्याकरिता बँकानी नागरिकांना प्रवृत्त करावे तसेच व्यापाऱ्यांना व लहान-मोठया दुकानदारांना पीओएस मशीनचा अथवा चेक व डेबिट कार्ड यासारख्या विविध इलेक्ट्रानिक माध्यमांचा वापर करण्यास सांगावे. त्यामुळे चलनी नोटाही व्यवहारात कमी प्रमाणात लागतील. प्रत्येकास व्यवहारासाठी पुरेशी रोख उपलब्ध होईल. भविष्यात कॅशलेस व्यवहाराने रोख रक्कमेची आवश्यकताही भासणार नाही. परिणामी प्रत्येकाचे आर्थिक व्यवहार सुरळीत तर होतीलच.सर्वांनी मोठया संख्येने नागरिकांमध्ये जनजागृती करुन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. या मेळाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीओएस मशीनचे वाटपही दुकानदारांना करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे श्री.रामटेके, इतर बँकाचे व्यवस्थापक, व्यापारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)