शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

'त्या' विजेच्या खांबाची मलमपट्टी !

By admin | Updated: January 10, 2015 01:04 IST

येथील धोकादायक विजेच्या खांबाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच, वीज मंडळाला जाग आली आणि बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षीत असलेल्या खांबाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले.

घोडपेठ : येथील धोकादायक विजेच्या खांबाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच, वीज मंडळाला जाग आली आणि बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षीत असलेल्या खांबाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले. या खांबाची आता थातूरमातूर डागडूजी करण्यात आली आहे.३० डिसेंबरच्या अंकात ‘घोडपेठ येथील विजेचा खांब धोकादायक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. घोडपेठ येथील ४० वर्षे जुना विजेचा खांब बुडातून पुर्णपणे सडला असुन तो केव्हाही उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आजुबाजुला घरे असल्यामुळे तसेच लहान मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीतीला अधिकाऱ्यांच्या निदर्शनास अनेकदा ही बाब आणून दिली. मात्र अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले होते.‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सडलेल्या खांबाला नट, बोल्ट व लोखंडी पट्टीच्या सहाय्याने तात्पुरती मलमपट्टी केली आहे. हा खांब वाकलेला असुन एखाद्यावेळी जवळच्याच घरावर पडुन मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज मंडळाकडून सध्या करण्यात आलेली खांबाची डागडुजी ही तात्पुरत्या स्वरूपात असुन फार काळ टिकणारी नसल्यामुळे हा खांब पुर्णपणे बदलविण्यात यावा, अशी मागणी घोडपेठ येथील नागरिकांकडुन केली जात आहे. (वार्ताहर)