शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बल्लारपूर तालुक्यात ९९ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

मंगल जीवने बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा ...

मंगल जीवने

बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा मात्र सोयाबीनचा पेरा १७० टक्क्याने वाढला आहे. पीक आता वर आले आहे. दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु पुनर्वसू नक्षत्राची रिमझिम सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

तालुक्यात यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या लवकर सुरू झाल्या. मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र संपेपर्यंत ९९ टक्के पेरण्या आटोपल्या. परंतु आर्द्रा नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले व पावसाच्या सरी बरसू लागल्याने शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागलेले डोळे सुखावले आहे. बल्लारपूर तालुक्यातील ३५ गावांमध्ये सात हजार नऊपेक्षा जास्त शेतकरी बांधव असून, तालुक्यामध्ये सात हजार ७८१ हेक्टर एवढे खरिपाचे पेरणी क्षेत्र आहे. आतापर्यंत चार हजार ५४९.९० हेक्टरवर बळीराजाने सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांची लागवड केली आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मागच्या वर्षी ३५१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. यंदा यात ५९७ हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचा पेरा १७० टक्क्यांनी वाढला आहे.

भात पिकाचे सरासरी क्षेत्र दोन हजार ८७७ हेक्टर आहे. यापैकी आवत्या २.५०, तर रोहिणी ५.४० हेक्टरवर झाली आहे. भातपिकाला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मागच्या वर्षी कापसाचा पेरा तीन हजार ७९१ हेक्टर होता. यावर्षी मात्र तीन हजार ५३८ हेक्टरवर थांबला आहे. कडधान्य पेरणी ५१३ हेक्टर पैकी ३६०.४० हेक्टरवर झाली आहे. हळद, मिरची, भाजीपाल्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे तर खरीप ज्वारी, मका, तीळ, फुलशेती व इतर कडधान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

कोट

तालुक्यात मागील आठवड्यात ८० टक्के पेरणी झाली होती व आता ती ९९ टक्क्यांवर पोहोचली आहे. यावर्षी शेतकरी बांधवांचा ओढा सोयाबीन पेरणीकडे वळल्याने सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे.

- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर

बॉक्स

एकूण पेरणी क्षेत्र - ७७८१ हे.

झालेली पेरणी - ४५४९ हे.

सोयाबीन- ५९७ हे.

कापूस- ३५३८ हे.

तूर- ३५८ हे.

080721\20210708_102127.jpg

सोयाबीन चे वर आलेले पीक.