शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात ९९ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

मंगल जीवने बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा ...

मंगल जीवने

बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा मात्र सोयाबीनचा पेरा १७० टक्क्याने वाढला आहे. पीक आता वर आले आहे. दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु पुनर्वसू नक्षत्राची रिमझिम सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

तालुक्यात यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या लवकर सुरू झाल्या. मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र संपेपर्यंत ९९ टक्के पेरण्या आटोपल्या. परंतु आर्द्रा नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले व पावसाच्या सरी बरसू लागल्याने शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागलेले डोळे सुखावले आहे. बल्लारपूर तालुक्यातील ३५ गावांमध्ये सात हजार नऊपेक्षा जास्त शेतकरी बांधव असून, तालुक्यामध्ये सात हजार ७८१ हेक्टर एवढे खरिपाचे पेरणी क्षेत्र आहे. आतापर्यंत चार हजार ५४९.९० हेक्टरवर बळीराजाने सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांची लागवड केली आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मागच्या वर्षी ३५१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. यंदा यात ५९७ हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचा पेरा १७० टक्क्यांनी वाढला आहे.

भात पिकाचे सरासरी क्षेत्र दोन हजार ८७७ हेक्टर आहे. यापैकी आवत्या २.५०, तर रोहिणी ५.४० हेक्टरवर झाली आहे. भातपिकाला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मागच्या वर्षी कापसाचा पेरा तीन हजार ७९१ हेक्टर होता. यावर्षी मात्र तीन हजार ५३८ हेक्टरवर थांबला आहे. कडधान्य पेरणी ५१३ हेक्टर पैकी ३६०.४० हेक्टरवर झाली आहे. हळद, मिरची, भाजीपाल्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे तर खरीप ज्वारी, मका, तीळ, फुलशेती व इतर कडधान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

कोट

तालुक्यात मागील आठवड्यात ८० टक्के पेरणी झाली होती व आता ती ९९ टक्क्यांवर पोहोचली आहे. यावर्षी शेतकरी बांधवांचा ओढा सोयाबीन पेरणीकडे वळल्याने सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे.

- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर

बॉक्स

एकूण पेरणी क्षेत्र - ७७८१ हे.

झालेली पेरणी - ४५४९ हे.

सोयाबीन- ५९७ हे.

कापूस- ३५३८ हे.

तूर- ३५८ हे.

080721\20210708_102127.jpg

सोयाबीन चे वर आलेले पीक.