शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बल्लारपुरात रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:13 IST

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तब्बल ५ तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे ( रेल्वे वॅगन ) रुळावर घेतले. रात्री ११ वाजता तेलंगाणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला.

            ही मालगाडी अंबुजा सिमेंट भरून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती, परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉइंटवर ३ डब्बे  रुळावरून घसरले. घटनेची माहिती इंजिनिअरिंग विभागाने तात्काळ नागपूर डीआरएम मुख्यालयास कळवली नागपूर येथील रेल्वे विभागाचे सहायक डीआरएम सतपती, स्टेशन मास्टर रामलालसिंग, येथील विभागीय हायक इंजिनिअर एन.ए.नागदेवे यांच्या देखरेखी खाली वर्धेवरून आलेल्या क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमेन यांनी रेल्वे वॅगन बाजूला करण्यात यश मिळविले व डब्बे यार्डमध्ये उभे करण्यात आले आहे. घटना स्थळाची पाहणी येथील रेल्वे डीआरयूसीसी चे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनीही केली. 

   घटनेच्या वेळी पाऊस सुरु होता. ही घटना नेमकी गोल पुलावर घडली. डब्बे खाली पडले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण गोलपुलाखालील रस्ता हा जाण्यायेणाऱ्यांचा वर्दळीचा असतो. कोरोना संकटामुळे सध्या बल्लारशाह स्थानकावर दिल्ली व आंध्रप्रदेश कडून येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे ट्राफिक जाम होण्याची पाळी आली नाही  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे