शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात चार वर्षात १० लाखाच्या जवळपास रोपवन मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली ...

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात चार वर्षात १० लाखाच्या जवळपास रोपवन

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्ष लागवडीची आठवण होऊ लागली आहे. कारण झाड पर्यावरणासाठी महत्वाची आहेत. कारण ती वर्षाला २२ किलोपेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात. त्यामुळे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. ही संकल्पना लक्षात घेऊन बल्लारशाह वन परिक्षेत्रात ५० कोटी वृक्ष लागवड योजनांतर्गत मागील चार वर्षात अंदाजे १० लाखाच्या जवळपास विविध प्रजातीचे रोपवन उभे असून पर्यावरणाचा समतोल राखत आहे.

बल्लारशाह वन परिक्षेत्रात कारवा, कळमना, उमरी, मानोरा व बल्लारशाह या पाच बिटात दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये विविध मिश्र प्रजातीचे रोपवन नर्सरीत तयार करून लावण्यात येते.

मागील चार वर्षात बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मानोरा उपक्षेत्रात ३ हजार ९०० हेक्टरवर २ लाखाच्या जवळपास विविध प्रजातीचे रोपवन तयार करण्यात आल्याची माहिती क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर यांनी दिली.

बॉक्स

वनकर्मचारी सांगतात...

बल्लारशाह वन परिक्षेत्रातील रोपवनाबाबत सांगताना क्षेत्र सहायक भोवरे म्हणाले, जिथे वन आहे तिथे जीव आहे. अलीकडे कोरोना काळात प्राणवायू विकत घेण्याची वेळ आली आहे. याला पर्याय वृक्ष संवर्धनाचा आहे.आणि आम्ही वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करीत आहो. उमरी वन परिक्षेत्राचे प्रवीण बिपटे यांनी वृक्ष लागवडीची माहिती देतांना सांगितले की मिश्र प्रजातीची रोपवन आता बहरले आहे. कळमनाचे क्षेत्र सहायक पुरी व कारवाचे रुंदन कातकर यांच्या नर्सरीत लावलेल्या रोपवनाची वाढ संपूर्ण झाली आहे. बल्लारशाह वन परिक्षेत्रातील अधिकारी संतोष थिपे म्हणाले,त्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांना या वृक्ष लागवडीचा निश्चितच फायदा होईल. गावशेजारी घेतलेल्या वृक्ष लागवडीमुळे गावाच्या शोभेत भर पडते. गावाच्या जवळ जंगल उभे राहते. त्यामुळे गावकऱ्यांना प्राणवायू मिळण्यास मदत होते. तसेच वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. पावसाचे प्रमाण वाढेल, जमिनीची धूप थांबेल.

वृक्ष लागवड करताना वनाची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.