शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बडतर्फ ६२ स्वयंपाकिणींच्या प्रश्नावर १५ दिवसात निर्णय घेणार

By admin | Updated: July 23, 2015 00:44 IST

जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून ...

सीईओंच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता : आठवडाभरापासून सुरू होते आंदोलनचंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून काढल्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले उपोषण बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. येत्या १५ दिवसात या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावरच आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.मागील १३ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर या ६२ बडतर्फ स्वयंपाकीनी आणि मदतनिसांचे आमरण उपोषण सुरु होते. मागील सत्रात कामावरून कमी केलेल्या या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी विविध पंचायत समिती स्तरावर आंदोलने सुरु होती. दरम्यानच्या काळात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली होती. त्यात १० जुलै २०१४ च्या शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन संबंधितांना कामावर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांना कामावर घेण्यात न आल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी १३ जुलैपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आरंभले होते. या काळात चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत होता. दरम्यान, २० जुलैला शिक्षणाधिकारी देशपांडे यांना उपोषण मंडपात पाठवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. मात्र तो विफल ठरला. बुधवारी परिस्थिती अधिकच चिघळून आंदोलनकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर येवून घोषणाबाजी सुरू केली. जेलभरो आंदोलनही पुकारले. परिस्थिती लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांनी शिष्टमंडळास आपल्या कक्षात चर्चस बोलावून बाजू ऐकून घेतली. येत्या पंधरा दिवसात यावर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र लेखी आश्वासनाशिवाय हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यावर लिंबूपाणी घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)