शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

बडतर्फ ६२ स्वयंपाकिणींच्या प्रश्नावर १५ दिवसात निर्णय घेणार

By admin | Updated: July 23, 2015 00:44 IST

जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून ...

सीईओंच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता : आठवडाभरापासून सुरू होते आंदोलनचंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून काढल्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले उपोषण बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. येत्या १५ दिवसात या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावरच आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.मागील १३ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर या ६२ बडतर्फ स्वयंपाकीनी आणि मदतनिसांचे आमरण उपोषण सुरु होते. मागील सत्रात कामावरून कमी केलेल्या या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी विविध पंचायत समिती स्तरावर आंदोलने सुरु होती. दरम्यानच्या काळात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली होती. त्यात १० जुलै २०१४ च्या शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन संबंधितांना कामावर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांना कामावर घेण्यात न आल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी १३ जुलैपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आरंभले होते. या काळात चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत होता. दरम्यान, २० जुलैला शिक्षणाधिकारी देशपांडे यांना उपोषण मंडपात पाठवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. मात्र तो विफल ठरला. बुधवारी परिस्थिती अधिकच चिघळून आंदोलनकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर येवून घोषणाबाजी सुरू केली. जेलभरो आंदोलनही पुकारले. परिस्थिती लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांनी शिष्टमंडळास आपल्या कक्षात चर्चस बोलावून बाजू ऐकून घेतली. येत्या पंधरा दिवसात यावर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र लेखी आश्वासनाशिवाय हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यावर लिंबूपाणी घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)