शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबुराव रामटेके

By admin | Updated: January 17, 2015 02:06 IST

सिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी.

बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी. मात्र ते खरे आहे. एका ध्येयनिष्ठ, जिद्दी, कर्तबगार माणसाने मोठ्या कष्टातून शून् जीवनगाथा आहे. बाबुराव ऋषीजी रामटेके, असे त्यांचे नाव आहे.त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम. केवळ एक एकर कोरडवाहू शेतीमध्ये पिकलेल्या थोड्याफार धान्याला आधार म्हणून इतरांच्या शेतात मोलमजुरीची कामे करून अल्पश: मिळकतीवर सहा मुली व एक मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाबुराव रामटेके यांच्या वडीलांना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे बाबुरावांना चौथ्या वर्गातच शिक्षण सोडून वयाच्या १२ व्या वर्षापासून शेतमजुरीच्या कामावर जावे लागले. शेतमजुरीचे काम करताना काही मजूर नागभीड ते सिंदेवाही नॅरोगेज रेल्वे लाईनचे काम करण्यास गेले. त्या काळात रामटेके यांनी १९६० ते ६५ पर्यंत कुली म्हणून ४० रुपये महिन्याप्रमाणे पाच वर्ष काम केले. रेल्वे लाईनचे काम संपल्यानंतर ते गावीच हरिदास गजभिये (सावकार) यांच्याकडे दरमहा १० कुडव धानावर पाच वर्षापर्यंत शेतमजुरीचे काम केले. या काळात ते इतर कामे करून कुटूंब सांभाळीत होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे कामानिमित्त गेले. त्या काळात त्यांचे नातेवाईक समुद्रपूर व हिंगणघाट येथे बैलबंडीने तांदूळ नेवून आठवडी बाजारात त्याची विक्री करीत होते. त्यांच्या संपर्काने रामटेके यांनीही तांदूळ विक्री व धान खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू केला. येथील सहकारी राईस मिलवर धानाची पिसाई करून बैलबंडीने चार पोते तांदुळ नवरगाव, नेरी, चिमूर मार्गे समुद्रपूरला नेवून विक्री करीत होते. त्या काळात समुद्रपुरला जाण्याकरिता बैलबंडीने दोन दिवस लागायचे. तत्पूर्वी रामटेके हे सायकलीवर पोते घेवून खेडे गावात कुठे आठ पायली तर कुठे पाच पायली धान खरेदी करीत होते. त्यानंतर त्यांनी सिंदेवाही येथे धान खरेदी करून स्वस्तीक राईस मिलवर धानाची पिसाई करून दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या ट्रकमध्ये दहा पोते तांदुळ व दोन पोते खंडा नागपूरला पाठविणे सुरू केले. या दरम्यान ते चारगाववरुन कधी सायकलीवर तर कधी पायी सिंदेवाहीपर्यंत पाच किलो मीटर येत असत. या व्यवसायात प्रगती केल्यानंतर १९९३ मध्ये त्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्र्गावर एक एकर जागा खरेदी केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून दहा लाखांचे कर्ज घेवून १९९६ मध्ये त्यांनी नागराज राईस मिलची उभारणी केली. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून स्वत:च्या राईस मिलवर धानाची पिसाई करून विविध जातीचे तांदुळ मुंबई, वाशी, नागपूरला पाठवितात.