शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबुराव रामटेके

By admin | Updated: January 17, 2015 02:06 IST

सिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी.

बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी. मात्र ते खरे आहे. एका ध्येयनिष्ठ, जिद्दी, कर्तबगार माणसाने मोठ्या कष्टातून शून् जीवनगाथा आहे. बाबुराव ऋषीजी रामटेके, असे त्यांचे नाव आहे.त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम. केवळ एक एकर कोरडवाहू शेतीमध्ये पिकलेल्या थोड्याफार धान्याला आधार म्हणून इतरांच्या शेतात मोलमजुरीची कामे करून अल्पश: मिळकतीवर सहा मुली व एक मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाबुराव रामटेके यांच्या वडीलांना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे बाबुरावांना चौथ्या वर्गातच शिक्षण सोडून वयाच्या १२ व्या वर्षापासून शेतमजुरीच्या कामावर जावे लागले. शेतमजुरीचे काम करताना काही मजूर नागभीड ते सिंदेवाही नॅरोगेज रेल्वे लाईनचे काम करण्यास गेले. त्या काळात रामटेके यांनी १९६० ते ६५ पर्यंत कुली म्हणून ४० रुपये महिन्याप्रमाणे पाच वर्ष काम केले. रेल्वे लाईनचे काम संपल्यानंतर ते गावीच हरिदास गजभिये (सावकार) यांच्याकडे दरमहा १० कुडव धानावर पाच वर्षापर्यंत शेतमजुरीचे काम केले. या काळात ते इतर कामे करून कुटूंब सांभाळीत होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे कामानिमित्त गेले. त्या काळात त्यांचे नातेवाईक समुद्रपूर व हिंगणघाट येथे बैलबंडीने तांदूळ नेवून आठवडी बाजारात त्याची विक्री करीत होते. त्यांच्या संपर्काने रामटेके यांनीही तांदूळ विक्री व धान खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू केला. येथील सहकारी राईस मिलवर धानाची पिसाई करून बैलबंडीने चार पोते तांदुळ नवरगाव, नेरी, चिमूर मार्गे समुद्रपूरला नेवून विक्री करीत होते. त्या काळात समुद्रपुरला जाण्याकरिता बैलबंडीने दोन दिवस लागायचे. तत्पूर्वी रामटेके हे सायकलीवर पोते घेवून खेडे गावात कुठे आठ पायली तर कुठे पाच पायली धान खरेदी करीत होते. त्यानंतर त्यांनी सिंदेवाही येथे धान खरेदी करून स्वस्तीक राईस मिलवर धानाची पिसाई करून दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या ट्रकमध्ये दहा पोते तांदुळ व दोन पोते खंडा नागपूरला पाठविणे सुरू केले. या दरम्यान ते चारगाववरुन कधी सायकलीवर तर कधी पायी सिंदेवाहीपर्यंत पाच किलो मीटर येत असत. या व्यवसायात प्रगती केल्यानंतर १९९३ मध्ये त्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्र्गावर एक एकर जागा खरेदी केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून दहा लाखांचे कर्ज घेवून १९९६ मध्ये त्यांनी नागराज राईस मिलची उभारणी केली. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून स्वत:च्या राईस मिलवर धानाची पिसाई करून विविध जातीचे तांदुळ मुंबई, वाशी, नागपूरला पाठवितात.