शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबुराव रामटेके

By admin | Updated: January 17, 2015 02:06 IST

सिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी.

बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी. मात्र ते खरे आहे. एका ध्येयनिष्ठ, जिद्दी, कर्तबगार माणसाने मोठ्या कष्टातून शून् जीवनगाथा आहे. बाबुराव ऋषीजी रामटेके, असे त्यांचे नाव आहे.त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम. केवळ एक एकर कोरडवाहू शेतीमध्ये पिकलेल्या थोड्याफार धान्याला आधार म्हणून इतरांच्या शेतात मोलमजुरीची कामे करून अल्पश: मिळकतीवर सहा मुली व एक मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाबुराव रामटेके यांच्या वडीलांना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे बाबुरावांना चौथ्या वर्गातच शिक्षण सोडून वयाच्या १२ व्या वर्षापासून शेतमजुरीच्या कामावर जावे लागले. शेतमजुरीचे काम करताना काही मजूर नागभीड ते सिंदेवाही नॅरोगेज रेल्वे लाईनचे काम करण्यास गेले. त्या काळात रामटेके यांनी १९६० ते ६५ पर्यंत कुली म्हणून ४० रुपये महिन्याप्रमाणे पाच वर्ष काम केले. रेल्वे लाईनचे काम संपल्यानंतर ते गावीच हरिदास गजभिये (सावकार) यांच्याकडे दरमहा १० कुडव धानावर पाच वर्षापर्यंत शेतमजुरीचे काम केले. या काळात ते इतर कामे करून कुटूंब सांभाळीत होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे कामानिमित्त गेले. त्या काळात त्यांचे नातेवाईक समुद्रपूर व हिंगणघाट येथे बैलबंडीने तांदूळ नेवून आठवडी बाजारात त्याची विक्री करीत होते. त्यांच्या संपर्काने रामटेके यांनीही तांदूळ विक्री व धान खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू केला. येथील सहकारी राईस मिलवर धानाची पिसाई करून बैलबंडीने चार पोते तांदुळ नवरगाव, नेरी, चिमूर मार्गे समुद्रपूरला नेवून विक्री करीत होते. त्या काळात समुद्रपुरला जाण्याकरिता बैलबंडीने दोन दिवस लागायचे. तत्पूर्वी रामटेके हे सायकलीवर पोते घेवून खेडे गावात कुठे आठ पायली तर कुठे पाच पायली धान खरेदी करीत होते. त्यानंतर त्यांनी सिंदेवाही येथे धान खरेदी करून स्वस्तीक राईस मिलवर धानाची पिसाई करून दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या ट्रकमध्ये दहा पोते तांदुळ व दोन पोते खंडा नागपूरला पाठविणे सुरू केले. या दरम्यान ते चारगाववरुन कधी सायकलीवर तर कधी पायी सिंदेवाहीपर्यंत पाच किलो मीटर येत असत. या व्यवसायात प्रगती केल्यानंतर १९९३ मध्ये त्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्र्गावर एक एकर जागा खरेदी केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून दहा लाखांचे कर्ज घेवून १९९६ मध्ये त्यांनी नागराज राईस मिलची उभारणी केली. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून स्वत:च्या राईस मिलवर धानाची पिसाई करून विविध जातीचे तांदुळ मुंबई, वाशी, नागपूरला पाठवितात.