शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली

By admin | Updated: April 16, 2016 00:43 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी संघर्ष केला.

हरीश गेडाम : ग्रामस्वराज्य अभियानाला प्रारंभबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी संघर्ष केला. त्यांच्या लढ्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या अतुलनिय कार्याने देश एकसंघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने समाज परिवर्तन होत आहे, असे मत बल्लारपूर पंचायतीचे माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात ग्राम उदय ते भारत उदय अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. सदर अभियान १४ ते २४ एप्रिल दरम्यान तालुक्यातील १७ ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. गेडाम बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू, पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मी कुमरे, सुशील गुंडावार, सुधाकर खांडरे, सुनील नुतलवार, सरिता उरकुडे, प्रदीप ताडुरवार, अभियंता श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. दरम्यान, उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना राष्ट्रीय समरसता दिनाप्रीत्यर्थ शपथ दिली.बीडीओ गजभे यांनी पंचायत राज संस्थेच्या बळकटीकरण करण्यासंदर्भात सदर अभियानात गावागावात सामाजिक सलोखा, शेतकऱ्यांचा विकास, गरिबांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना आणि ग्राम किसान सभा आयोजित करण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. संचालन तावाडे यांनी तर आभार लक्ष्मी कुमरे यांनी मानले. यावेळी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)