शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:04 IST

राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमंत्रीमंडळाचा निर्णय अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१९-२० चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना याबाबत केलेल्या घोषणेची पूर्तता झाली आहे.जगात सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा विकास होत आहे. उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घन वन अर्थात डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. भारतामध्ये बंगलोर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीच्या जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरित्या विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे यश लक्षात घेवून राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व शहर विकास प्राधिकरणे यांच्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.राज्यातील वनक्षेत्र व वनेतर क्षेत्रावरील वृक्षाच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड मोहिम व संगोपन कार्यक्रम निरंतरपणे पुढे सुरू राहण्यासाठी शहरी आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात असलेली मोकळया जागांची कमतरता लक्षात घेता अन्य पर्याय वापरून वृक्षाच्छादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.योजनेचा उद्देशशहरी भागातील जागेची कमतरता विचारात घेवून छोटया छोटया क्षेत्रात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करणे, रोपवनास जैविक पदार्थ, सेंद्रीय खते, पाणी अशा पूरक संसाधनाची जोड देवून कमी कालावधीत रोपांची चांगली व जलद वाढ साधणे, जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखणे, शहरी भागात वृक्षराजी वाढवून प्रदूषणावर नियंत्रण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार