शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:04 IST

राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमंत्रीमंडळाचा निर्णय अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१९-२० चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना याबाबत केलेल्या घोषणेची पूर्तता झाली आहे.जगात सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा विकास होत आहे. उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घन वन अर्थात डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. भारतामध्ये बंगलोर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीच्या जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरित्या विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे यश लक्षात घेवून राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व शहर विकास प्राधिकरणे यांच्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.राज्यातील वनक्षेत्र व वनेतर क्षेत्रावरील वृक्षाच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड मोहिम व संगोपन कार्यक्रम निरंतरपणे पुढे सुरू राहण्यासाठी शहरी आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात असलेली मोकळया जागांची कमतरता लक्षात घेता अन्य पर्याय वापरून वृक्षाच्छादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.योजनेचा उद्देशशहरी भागातील जागेची कमतरता विचारात घेवून छोटया छोटया क्षेत्रात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करणे, रोपवनास जैविक पदार्थ, सेंद्रीय खते, पाणी अशा पूरक संसाधनाची जोड देवून कमी कालावधीत रोपांची चांगली व जलद वाढ साधणे, जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखणे, शहरी भागात वृक्षराजी वाढवून प्रदूषणावर नियंत्रण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार