शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सुधारित व देशी बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन

By admin | Updated: June 15, 2014 23:28 IST

शेतकऱ्यांनी सुधारित व देशी बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील विशेषत: जिवतीसारख्या अतिदुर्गम व पहाडी तालुक्यात सोयाबीन, तूर,

जिवती : शेतकऱ्यांनी सुधारित व देशी बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील विशेषत: जिवतीसारख्या अतिदुर्गम व पहाडी तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडिद कपाशी ही पिके घेतली जातात. परंतु दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल बाजारातील बियाणे घेण्यावर अधिक आहे. त्यामुळे बियाण्यावर फार मोठ्या प्रमाणात रक्कम खर्ची केली जाते. वास्तविकता सोयाबिन, तूर, मूग, उडीदसारखे बियाणे हे सुधारित बियाणे आहे.बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासून पुन्हा हे बियाणे पेरता येते. परंतु शेतकरी मात्र तयार बियाणे घेणे पसंत करीत असल्याने पारंपरिक बियाणे नामशेष होत आहेत. पर्यायाने बियाणे कंपन्यांचा फायदा होत आहे. शेतकरी आपले बियाणे व्यापाऱ्यांना विकतात. परंतु पेरणीसाठी शिल्लक ठेवत नाही. ही मानसिकता बदलविणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी व्यक्त केले. जिवती तालुक्यात बीटी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बोंडअळी वगळता रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव मागील पाच वर्षापासून वाढला आहे. हवढे करुनही सरासरी एकरी तीन ते चार क्विंटल उत्पन्न येते.ही परिस्थिती लक्षात घेऊन मागील वर्षी या तालुक्यात एच. डी. पी.एस. अर्थात कपासीची सधन लागवड करण्यात आली. पी.के.व्ही. ०८१ व एनएच६१५ या देशी वाणाची ६० बाय १० से.मी. अंतरावर एकरी चार किलो बियाणे पेरले. उत्पन्न सरासरी एकरी चार ते पाच क्विंटल आले. या वर्षीसुद्धा सूरज या देशी वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कपाशीचे बियाणे पुढील हंगामात शेतकऱ्यांना उपयोगात आणता येणे शक्य होणार आहे. ग्राम बिजोत्पादन हा मंत्र शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा अशी विनंती राज वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)