शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

निनावी तक्रार अर्ज होणार आता बेदखल

By admin | Updated: October 26, 2015 01:12 IST

वैयक्तीक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही.

राजकुमार चुनारकर खडसंगीवैयक्तीक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही. याबाबत अप्पर मुख्य सचिव डॉ.पी.एस. मीना यांनी निनावी व खोट्या तक्रारींची दखल घेवू नये, असा आदेश मंत्रालयासह राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांसाठी जारी केला आहे. या आदेशामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर आळा बसून त्यांच्या दुकानदाऱ्या बंद होणार आहे.प्रशासकीय कार्यालयामध्ये महसुल, पोलीस विभाग तथा इतरही विभागाकडे निनावी तक्रारी दाखल होत असतात. आज अखेर अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन चौकशी केली जात असे. परंतु, बहुतांश तक्रार अर्ज हे प्रतिस्पर्धी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कार्यालयाकडे पाठविले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या १८ आॅक्टोबर २०१३ च्या शासन नियमानुसार अप्पर मुख्य सचिव डॉ. मीना यांनी तक्रारदाराचे नाव व पत्ता नोंद केलेला नाही, अशा निनावी तक्रारीमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंर्तभुत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येवू नये. ती तक्रार फक्त दप्तरी नोंद करावी, असा आदेश काढला आहे.या आदेशाप्रमाणे सर्वच शासकीय कार्यालयातून कार्यवाही करण्यात येणार आहे. या नव्या आदेशामुळे निनावी खोट्या व हेतू पुरस्कर तक्रारी करुन वचपा काढण्याच्या अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्यात आले आहे. तसेच खोट्या तक्रारी करून काही प्रमाणात ‘लक्ष्मी दर्शन’ करण्याच्याही प्रकारावर या आदेशामुळे लगाम लागणार असल्याचे शासकीय वर्तुळातून बोलल्या जात आहे. आरोपात तथ्य असल्यास दखलज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येऊ शकते, असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारी संबंधात प्रशासकीय किंवा मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ती तक्रार मुळ तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घेण्यात यावी. त्याच्याकडून पंधरा दिवसात प्रतिसाद मिळाला तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे. त्यानंतरही माहिती प्राप्त न झाल्यास ती तक्रार खोट्या नावाची असल्याची नोंद करून दप्तरी दाखल करण्यात यावी. तसेच आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास त्यावर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील नाव, पत्ता गोपनीय ठेवून त्याची छायांकीत प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणाकडे द्यावी व अर्जाप्रमाणे कार्यवाही करावी असे या आदेशात म्हटले आहे.ब्लॅकमेलिंगवर बसणार आळानिनावी खोट्या तक्रारी करायच्या व नंतर वरिष्ठाकडून दबाव आणण्याच्या प्रकारात अलीकडे चांगलीच वाढ झाल्याचे काही प्रकरणावरुन निदर्शनात आले. ज्याच्या संबंधात तक्रार आहे, त्याच्याकडून काही मिळाले तर तक्रार परत घ्यायची, असे प्रकार हल्ली वाढले होते. मात्र या आदेशामुळे अशा महाभागावर आळा बसण्यास मदत होणार आहे.