शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:50 IST

काही दिवस शासनाने हमी भाव देऊन तूर खरेदी केली व बंद करून दिली. त्यानंतर ३१ मेपर्यंत तूर खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची घोषणा केल्याने ...

भाव गडगडले : हजारो क्विंटल तूर शेतकऱ्याकडे शिल्लक, शेतकरी चिंतातूरप्रविण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : काही दिवस शासनाने हमी भाव देऊन तूर खरेदी केली व बंद करून दिली. त्यानंतर ३१ मेपर्यंत तूर खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची घोषणा केल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या घोषणेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही शासनाने तूर खरेदीबाबत बाजार समित्यांना लेखी अद्यापही कळविले नाही. त्यामुळे शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार तर नाही ना, अशी चर्चा तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.यावर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणल्यावर खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. शासनाने तुरीकरिता पाच हजार ५० रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु कित्येक दिवस शासनाने तुर हमीभावाने खरेदी करणारे केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली गरज भागविण्यासाठी हमीभावापेक्षा कमी दराने तुरी विकल्या. त्यानंतर शासनाने अनेक केंद्र हमीभावाने तुर खरेदीसाठी सुरू केले. हमीभाव पाच हजार पाचशे रूपये प्रति क्विंटल मिळत असल्याने शासनाच्या तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. तुरीच्या वजनाकरिता कित्येक दिवस शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागले. तरीही शेतकऱ्यांनी यातना सहन केल्या. मात्र शासनाने तुर खरेदी बंद केली. परंतु आजही हजारो क्विंटल तुर शेतकऱ्यांच्या घरात पडुन आहे. त्यामुळे शासनाने पाच दिवसांपुर्वी ३१ मेपर्यंत तुर शासन खरेदी करेल, अशी घोषणा केली. बाजार समित्यांकडून तत्काळ अहवाल मागून घेतला. परंतु एक एक दिवस घोषणेनंतर लोटत आहे व तुर खरेदीची ३१ मे ही तारीख जवळ येत आहे. परंतु शासनाने अद्यापही बाजार समित्यांना लेखी आदेश दिले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दिवसा गणीक बाजार समिती कार्यालयात जावून तुर खरेदी केव्हा सुरू होणार, याची चौकशी शेतकरी करीत आहे. परंतु असे कोणतेही निर्देश आले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.सातबाऱ्यावर नमूद असणे आवश्यकनाफे ड केंद्रावर तुर विक्रीसाठी आणत असताना पेरीव पत्र म्हणजेच सातबाऱ्यावर तूर पेरल्याचे नमुद असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा तुर स्विकारल्या जाणार नाही. यामुळे तुर शिल्लक असलेले शेतकरी सातबारा पेरीव पत्र काढून सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे. या सक्तीमुळे शेती नसलेले परंतु तुर विक्री करण्याकरिता नाफे डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना लगाम बसणार असल्याचे मानले जात आहे.तातडीने तूर खरेदी करावी शेतकऱ्याकडे हजारो क्विंटल तुरी शिल्लक आहे. खुल्या बाजारात अत्यल्प दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. नव्याने येणाऱ्या शेतीच्या हंगामाकरिता शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर नाफे डमार्फ त तातडीने खरेदी करणे सुरू करावे, यासाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामूळे शासनाने तातडीने तूर खरेदी करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.विशाल बदखल , सभापती.गोंधळ उडण्याची शक्यताकाही दिवस बंद असलेली नाफेड खरेदी सुरू करण्याची घोषणा शासनाने केली. याला पाच दिवसांचा कालावधी लोटत आहे. ज्यादिवशी तुर खरेदी केंद्र सुरू होईल, त्या दिवशी मोठ्या प्रमाणात आवक येईल. त्यामूळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे.