शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 26, 2015 01:14 IST

राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती ...

मुख्यमंत्र्यांना पत्र : वडेट्टीवार यांची मागणीचंद्रपूर: राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने २० आॅक्टोबर रोजी जाहीर केली. त्याप्रमाणे अध्यादेश काढलेला आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याला पूर्णत: वगळलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी करुनसुद्धा पाण्याअभावी धान, सोयाबिन, कापूस यासारखे पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतामध्ये जे काही पीक उभे आहेत, त्यामधून ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन होणार असल्याने आर्थिक परिस्थिती अभावी शेतकरी हवालदिल होणार आहे. केंद्र आणि राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दोन मंत्री असताना सुद्धाराज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीमधून चंद्रपूर जिल्ह्याला वगळलेले असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करुन सरसकट प्रती हेक्टर २० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे उपगट नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. सुरुवातीला चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची सुरुवात केली. परंतु नंतर वेळोवेळी कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे हजारो हेक्टर शेतातील पिके उद्धवस्त झालीत तर काही पिके शेतामध्ये उभे असून त्या पिकांची वाढसुद्धा बरोबर झालेली नाही. पिकांची परिस्थितीसुद्धा पोटरी, फुलोरा व लोबी अवस्थेत असून सदर पिकावर तुडतुडे, खोडकिडा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, कापूस पिकांचे उत्पादन ५० टक्क्याच्यावर होणार किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. (प्रतिनिधी)