शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ५३ गावांत दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून

शेतकऱ्यांची मागणी : आंदोलनाचा इशाराराजुरा : खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आली. उर्वरित गावांत संबंधित अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती बघितली नाही. याचा फटका ५३ गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या गावातील शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून कापूस, सोयाबीन पीक घेत आहेत. सातबारामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन, धान, तूर पिकाची नोंद आहे. मात्र, गावनिहाय सर्व्हे करण्याची तसदी अधिकाऱ्यांनी न घेतल्याने ५३ गावे पैसेवारीपासून वंचित राहिले. आणेवारी प्रत्येक गावात गाव तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच व गावकरी समक्ष प्लॉट टाकून पिकाची पाहणी करून आणेवारी काढली जाते, पण तसे न करता अधिकाऱ्यांनी गावात न जाता प्रत्यक्ष कार्यालयात बसून जुन्या पद्धतीने आणेवारी काढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून या गावातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. कर्ज घेऊन मेहनतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबारा-तिबारा पेरणी करून पिके वाढविली. परंतु, शेवटच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन प्रती बॅग ३० किलो मागे फक्त १०० किलोची उतारी मिळाली. तर बाजारभाव केवळ २५०० रुपये मिळाला. प्रति एकर खर्च आठ हजार रुपये आले. कपाशीचे पीक पाहून दिलासा मिळाला. परंतु पावसाने दांडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली. यातच लाल्या रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने प्रति एकर दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. कापसाची पडत्या भावाने विक्री होत आहे.पावसाच्या लहरीपणामुळे धान पीक करपले. अशात ज्या ठिकाणी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आहे, ते क्षेत्र बाधीत करण्यात यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. केंद्राने हे मान्य केल्यामुळे केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर पंचनामे न करता मदत दिल्या जाईल, असे राज्य सरकारचे म्हणने आहे. मात्र, ५३ गावे पुर्वीच्या आणेवारीमुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे गावनिहाय प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून, पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून उर्वरीत ५३ गावे दुष्काळ घोषीत करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)