शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

‘त्या’ ५३ गावांत दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून

शेतकऱ्यांची मागणी : आंदोलनाचा इशाराराजुरा : खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आली. उर्वरित गावांत संबंधित अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती बघितली नाही. याचा फटका ५३ गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या गावातील शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून कापूस, सोयाबीन पीक घेत आहेत. सातबारामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन, धान, तूर पिकाची नोंद आहे. मात्र, गावनिहाय सर्व्हे करण्याची तसदी अधिकाऱ्यांनी न घेतल्याने ५३ गावे पैसेवारीपासून वंचित राहिले. आणेवारी प्रत्येक गावात गाव तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच व गावकरी समक्ष प्लॉट टाकून पिकाची पाहणी करून आणेवारी काढली जाते, पण तसे न करता अधिकाऱ्यांनी गावात न जाता प्रत्यक्ष कार्यालयात बसून जुन्या पद्धतीने आणेवारी काढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून या गावातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. कर्ज घेऊन मेहनतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबारा-तिबारा पेरणी करून पिके वाढविली. परंतु, शेवटच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन प्रती बॅग ३० किलो मागे फक्त १०० किलोची उतारी मिळाली. तर बाजारभाव केवळ २५०० रुपये मिळाला. प्रति एकर खर्च आठ हजार रुपये आले. कपाशीचे पीक पाहून दिलासा मिळाला. परंतु पावसाने दांडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली. यातच लाल्या रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने प्रति एकर दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. कापसाची पडत्या भावाने विक्री होत आहे.पावसाच्या लहरीपणामुळे धान पीक करपले. अशात ज्या ठिकाणी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आहे, ते क्षेत्र बाधीत करण्यात यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. केंद्राने हे मान्य केल्यामुळे केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर पंचनामे न करता मदत दिल्या जाईल, असे राज्य सरकारचे म्हणने आहे. मात्र, ५३ गावे पुर्वीच्या आणेवारीमुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे गावनिहाय प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून, पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून उर्वरीत ५३ गावे दुष्काळ घोषीत करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)