शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

‘त्या’ ५३ गावांत दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून

शेतकऱ्यांची मागणी : आंदोलनाचा इशाराराजुरा : खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आली. उर्वरित गावांत संबंधित अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती बघितली नाही. याचा फटका ५३ गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या गावातील शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून कापूस, सोयाबीन पीक घेत आहेत. सातबारामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन, धान, तूर पिकाची नोंद आहे. मात्र, गावनिहाय सर्व्हे करण्याची तसदी अधिकाऱ्यांनी न घेतल्याने ५३ गावे पैसेवारीपासून वंचित राहिले. आणेवारी प्रत्येक गावात गाव तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच व गावकरी समक्ष प्लॉट टाकून पिकाची पाहणी करून आणेवारी काढली जाते, पण तसे न करता अधिकाऱ्यांनी गावात न जाता प्रत्यक्ष कार्यालयात बसून जुन्या पद्धतीने आणेवारी काढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून या गावातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. कर्ज घेऊन मेहनतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबारा-तिबारा पेरणी करून पिके वाढविली. परंतु, शेवटच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन प्रती बॅग ३० किलो मागे फक्त १०० किलोची उतारी मिळाली. तर बाजारभाव केवळ २५०० रुपये मिळाला. प्रति एकर खर्च आठ हजार रुपये आले. कपाशीचे पीक पाहून दिलासा मिळाला. परंतु पावसाने दांडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली. यातच लाल्या रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने प्रति एकर दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. कापसाची पडत्या भावाने विक्री होत आहे.पावसाच्या लहरीपणामुळे धान पीक करपले. अशात ज्या ठिकाणी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आहे, ते क्षेत्र बाधीत करण्यात यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. केंद्राने हे मान्य केल्यामुळे केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर पंचनामे न करता मदत दिल्या जाईल, असे राज्य सरकारचे म्हणने आहे. मात्र, ५३ गावे पुर्वीच्या आणेवारीमुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे गावनिहाय प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून, पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून उर्वरीत ५३ गावे दुष्काळ घोषीत करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)