शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘त्या’ ५३ गावांत दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून

शेतकऱ्यांची मागणी : आंदोलनाचा इशाराराजुरा : खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आली. उर्वरित गावांत संबंधित अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती बघितली नाही. याचा फटका ५३ गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या गावातील शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून कापूस, सोयाबीन पीक घेत आहेत. सातबारामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन, धान, तूर पिकाची नोंद आहे. मात्र, गावनिहाय सर्व्हे करण्याची तसदी अधिकाऱ्यांनी न घेतल्याने ५३ गावे पैसेवारीपासून वंचित राहिले. आणेवारी प्रत्येक गावात गाव तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच व गावकरी समक्ष प्लॉट टाकून पिकाची पाहणी करून आणेवारी काढली जाते, पण तसे न करता अधिकाऱ्यांनी गावात न जाता प्रत्यक्ष कार्यालयात बसून जुन्या पद्धतीने आणेवारी काढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून या गावातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. कर्ज घेऊन मेहनतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबारा-तिबारा पेरणी करून पिके वाढविली. परंतु, शेवटच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन प्रती बॅग ३० किलो मागे फक्त १०० किलोची उतारी मिळाली. तर बाजारभाव केवळ २५०० रुपये मिळाला. प्रति एकर खर्च आठ हजार रुपये आले. कपाशीचे पीक पाहून दिलासा मिळाला. परंतु पावसाने दांडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली. यातच लाल्या रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने प्रति एकर दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. कापसाची पडत्या भावाने विक्री होत आहे.पावसाच्या लहरीपणामुळे धान पीक करपले. अशात ज्या ठिकाणी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आहे, ते क्षेत्र बाधीत करण्यात यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. केंद्राने हे मान्य केल्यामुळे केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर पंचनामे न करता मदत दिल्या जाईल, असे राज्य सरकारचे म्हणने आहे. मात्र, ५३ गावे पुर्वीच्या आणेवारीमुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे गावनिहाय प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून, पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून उर्वरीत ५३ गावे दुष्काळ घोषीत करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)