शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

नळाच्या पाण्यासाठी संतप्त महिलांचा भिसी ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST

भिसी : चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड क्रमांक एक व दोनमधील महिलांनी नळाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या मांडला. जोपर्यंत ...

भिसी : चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड क्रमांक एक व दोनमधील महिलांनी नळाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या मांडला. जोपर्यंत आमच्या नळाचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्रा मंगळवारी सकाळी ११ वाजता या महिलांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली.

सहा दिवसांपूर्वीही या महिला ग्रामपंचायतीमध्ये नळाच्या पाण्यासाठी ठाण मांडून बसल्या होत्या.

त्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपासून नळांना पाणी येत नाही. मुख्य पाइपलाइनवर सात-आठ नागरिकांना कनेक्शन देण्यात आले आहे. शिवाय काही लोक नळाला मोटार लावून पाणी ओढून घेतात. मात्र आमचे नळ कनेक्शन छोट्या पाइपलाइनवरून असल्यामुळे आमच्या नळाला मुळीच पाणी येत नाही, असा आरोप या संतप्त महिलांचा आहे. आम्हालाही मुख्य पाइपलाइनवरून जोडणी द्यावी किंवा सगळ्यांना वितरण लाइनवरून जोडणी द्यावी, अशी मागणी या महिलांची आहे.

तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाला अर्ज देऊनही न्याय न मिळाल्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करून महिला मेटकुटीस आल्यामुळे महिलांनी अखेर ग्रामपंचायतमध्येच ठिय्या धरला.

ग्रामपंचायतीचा गलथान कारभार

वॉर्ड क्रमांक एकमधील देवीदास कोटनाके यांचा नळ अडीच वर्षांपासून बंद आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाइपलाइन दुरुस्त केल्या जात नाही. एकंदरीत ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा संताप वाढतच चालला आहे. दीड वर्षांपूर्वी वॉर्ड क्रमांक पाच व सहामधील महिला व पुरुषांनी नळाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला होता. ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे नुकसान करत सरपंच योगिता गोहणे यांना मारहाण केली होती. मोर्चेकरी महिला व युवकांवर गुन्हेही दाखल झाले होते.