शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

नाराजीने बिघडले आघाडीचे गणित

By admin | Updated: September 21, 2014 23:47 IST

५७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि सात जागा असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस या मित्रपक्षाला (अर्थात भाराकाँ-राकाँ आघाडीला)

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर५७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि सात जागा असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस या मित्रपक्षाला (अर्थात भाराकाँ-राकाँ आघाडीला) २८ अधिक एक २९ चा मेळ साधत सत्तेपर्यंत पोहचता मात्र आलेले नाही. जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेली सत्तेची संधी निव्वळ अंतर्गत नाराजी आणि विसंवादाने गमावल्याची चुटपूट आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे.गेल्या वेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा पदर पकडून उपाध्यक्षपद आणि एक सभापतिपद मिळवून सत्ताफळे चाखली. अख्ख्या राज्यभर या अभद्र मैत्रीची चर्चाही झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ही मैत्री तोडण्याचे आदेशही आले होते. मात्र सत्तेचे गुळपिठ सुरूच राहीले.ऐन पंधरवड्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुनाच कित्ता गिरविणे शक्य नव्हते. मुंबईतूनही तसे फर्मान आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले. मात्र एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांतील सदस्यांच्या नाराजीचा आणि अंतर्मनाचा विचार झाला नाही. परिणामत: वरपांगी २८ चा आकडा गाठूनही सत्तेची जुळवाजुळव करण्यात यश न आल्याने अखेर जिल्हा परिषदेवर भाजपाला सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका लागताच भाजपाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत सर्वांना गोळा केले. राष्ट्रवादीकडेही गळ टाकून पाहीला. सात पैकी चार जण गळाला लागलेही. मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी तिघांना घरी परत आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. पंकज पवार यांना मनविण्यात मात्र राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले. परिणाम व्हायचा तोच झाला. एक मत डोळ्यादेखत दुसऱ्या पारड्यात पडले.काँग्रेसच्या चित्रा डांगे यांनी मतदान प्रक्रियेत तटस्थ भूमिका घेतली. पण या तटस्थ भूमिकेमागे वेगळेच महाभारत आहे. अध्यक्षपदाचे गाजर दाखवून ऐनवेळी नेत्यांनी त्यांना सभागृहातच हुलकावणी दिली. शब्द देऊनही आपलेच नेते ऐनवेळी दगा देत असल्याचे पाहून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. सभागृहात त्यांना समजाविण्यात आले. नेत्यांनी नियोजनपूर्वक चित्रा डांगे यांना आधीच समजावले असते, तर कदाचित चित्रही वेगळे असते. खरे तर, काँग्रेसचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्यावरून गेल्या १२ तासांपासून घोळ सुरू होता. उपाध्यक्षपदावरूनही असेच चर्चीतचर्वण सुरू होते. नावे ठरली तोपर्यंत वेळ मात्र पुढे सरकून गेली होती.राष्ट्रवादीने आधीपासून ‘हातचे दोन’ दाखवा, अशी भूमिका काँग्रेसपुढे घेतली होती. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत गुंतल्याने वेळेपर्यंत काहीच साधले नाही. मोबाईलचे बिल वाढविण्यातच वेळ गेला. शिवसेनेच्या सदस्यांनी दगा दिल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. सेनेचे दोन सदस्य ऐनवेळी फितूर झाल्याचाही आरोप आहे. पण भाजपाने साधलेली खेळी काँगे्रसच्या अंगलटास आली, हे मान्य करावेच लागणार आहे. शिवसेनेचे सदस्य एकाच वेळी दोन्हीकडे संपर्क ठेवून होते. अशातच आमदार सुधीर मुनगंटीवारांनी राजकीय खेळी करून त्यांच्या हाती कमळ दिले. इकडे मात्र २८ अधिक दोन बरोबर तीस असे गणित करणाऱ्या नेत्यांच्या हाती मात्र भोपळा आला.