शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

नाराजीने बिघडले आघाडीचे गणित

By admin | Updated: September 21, 2014 23:47 IST

५७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि सात जागा असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस या मित्रपक्षाला (अर्थात भाराकाँ-राकाँ आघाडीला)

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर५७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि सात जागा असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस या मित्रपक्षाला (अर्थात भाराकाँ-राकाँ आघाडीला) २८ अधिक एक २९ चा मेळ साधत सत्तेपर्यंत पोहचता मात्र आलेले नाही. जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेली सत्तेची संधी निव्वळ अंतर्गत नाराजी आणि विसंवादाने गमावल्याची चुटपूट आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे.गेल्या वेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा पदर पकडून उपाध्यक्षपद आणि एक सभापतिपद मिळवून सत्ताफळे चाखली. अख्ख्या राज्यभर या अभद्र मैत्रीची चर्चाही झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ही मैत्री तोडण्याचे आदेशही आले होते. मात्र सत्तेचे गुळपिठ सुरूच राहीले.ऐन पंधरवड्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुनाच कित्ता गिरविणे शक्य नव्हते. मुंबईतूनही तसे फर्मान आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले. मात्र एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांतील सदस्यांच्या नाराजीचा आणि अंतर्मनाचा विचार झाला नाही. परिणामत: वरपांगी २८ चा आकडा गाठूनही सत्तेची जुळवाजुळव करण्यात यश न आल्याने अखेर जिल्हा परिषदेवर भाजपाला सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका लागताच भाजपाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत सर्वांना गोळा केले. राष्ट्रवादीकडेही गळ टाकून पाहीला. सात पैकी चार जण गळाला लागलेही. मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी तिघांना घरी परत आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. पंकज पवार यांना मनविण्यात मात्र राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले. परिणाम व्हायचा तोच झाला. एक मत डोळ्यादेखत दुसऱ्या पारड्यात पडले.काँग्रेसच्या चित्रा डांगे यांनी मतदान प्रक्रियेत तटस्थ भूमिका घेतली. पण या तटस्थ भूमिकेमागे वेगळेच महाभारत आहे. अध्यक्षपदाचे गाजर दाखवून ऐनवेळी नेत्यांनी त्यांना सभागृहातच हुलकावणी दिली. शब्द देऊनही आपलेच नेते ऐनवेळी दगा देत असल्याचे पाहून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. सभागृहात त्यांना समजाविण्यात आले. नेत्यांनी नियोजनपूर्वक चित्रा डांगे यांना आधीच समजावले असते, तर कदाचित चित्रही वेगळे असते. खरे तर, काँग्रेसचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्यावरून गेल्या १२ तासांपासून घोळ सुरू होता. उपाध्यक्षपदावरूनही असेच चर्चीतचर्वण सुरू होते. नावे ठरली तोपर्यंत वेळ मात्र पुढे सरकून गेली होती.राष्ट्रवादीने आधीपासून ‘हातचे दोन’ दाखवा, अशी भूमिका काँग्रेसपुढे घेतली होती. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत गुंतल्याने वेळेपर्यंत काहीच साधले नाही. मोबाईलचे बिल वाढविण्यातच वेळ गेला. शिवसेनेच्या सदस्यांनी दगा दिल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. सेनेचे दोन सदस्य ऐनवेळी फितूर झाल्याचाही आरोप आहे. पण भाजपाने साधलेली खेळी काँगे्रसच्या अंगलटास आली, हे मान्य करावेच लागणार आहे. शिवसेनेचे सदस्य एकाच वेळी दोन्हीकडे संपर्क ठेवून होते. अशातच आमदार सुधीर मुनगंटीवारांनी राजकीय खेळी करून त्यांच्या हाती कमळ दिले. इकडे मात्र २८ अधिक दोन बरोबर तीस असे गणित करणाऱ्या नेत्यांच्या हाती मात्र भोपळा आला.