शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

अणेरावची कविता मराठी साहित्यात दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

लोकयात्रा फाउंडेशन व जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळा आयोजित भंडारा येथील कवी, रेखाचित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत ...

लोकयात्रा फाउंडेशन व जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळा आयोजित भंडारा येथील कवी, रेखाचित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत नाही’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲड. पारोमिता गोस्वामी, डॉ. श्याम मोहरकर, कवी प्रमोदकुमार अणेराव, श्रीपाद प्रभाकर जोशी, श्रीकांत साव उपस्थित होते.

ॲड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, काळाचा अस्वस्थ भवताल सलग वाचताच येत नाही. सुन्नता भरून येते. टी.एस. एलियेटचे वेस्ट लॅड वाचताना हीच अवस्था होते. स्त्रियांना समग्र बंधनातून मुक्त होण्यासाठी कविता आश्वासकता देते. अणेरावांची कविता भवतालचा अस्वस्थ कोलाहल मांडणारी महत्त्वपूर्ण आहे.

डॉ. मोहरकर यांनी अणेराव यांची कविता वर्तमानाचा सातबारा आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. कवी अणेराव यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक लोकयात्रा अध्यक्ष श्रीकांत साव, संचालन कवी अविनाश पोईनकर यांनी केले. आभार जय कातकर यांनी मानले.

दुस-या सत्रात कवी श्रीपाद प्रभाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. दीपक चटप यांच्या संचालनात कविसंमेलन पार पडले. यात आचार्य ना. गो. थुटे, किशोर मुगल, किशोर कवठे, इरफान शेख, राजेश बारसागडे, डॉ. प्रशांत आर्वे, नरेशकुमार बोरीकर, प्रदीप देशमुख, विजय वाटेकर, गीता रायपुरे, संजय येरणे, खुशालदास कामडी, अर्जुमन शेख यांनी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. आभार स्वप्निल मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. दीपक तुराणकर, अतुल श्रीगंदेवार, नितीन पिंपळे, स्वाती देशेट्टीवार, सूचिता खनके, प्रियंका डोंगरे यांनी सहकार्य केले.