शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

शासन प्रशासनाच्या अनास्थेने नव्या वसाहती तहानलेल्याच

By admin | Updated: October 9, 2015 01:46 IST

शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे सन १९९८ मध्ये चंद्रपूर शहरासाठी मंजुरी मिळालेल्या ३८ कोटींची योजना बासनात गुंडाळल्या गेली.

३८ कोटींची योजना बारगळली : नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा डोजचंद्रपूर: शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे सन १९९८ मध्ये चंद्रपूर शहरासाठी मंजुरी मिळालेल्या ३८ कोटींची योजना बासनात गुंडाळल्या गेली. वाढीव पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली असती तर शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळाले असते. योजना अर्ध्यावरच जिरल्याने शहरातील काही भाग आणि चहुबाजुने वसलेल्या नव्या वसाहती आजही पाण्याविना व्याकूळ झाल्या आहेत. १९६४ मध्ये अस्तित्वात आलेल्या जुन्याच पाणी पुरवठा योजनेवर शहराची तहान भागविली जात आहे. त्यातही केवळ ४० टक्के लोकांपर्यंतच या योजनेचे पाणी मिळत आहे. तेही मुबलक नसून वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा अन्य स्त्रोतांमधून उपसा करावा लागत आहे. पाणी असूनही नागरिकांना नळयोजनेचे मुबलक पाणी मिळत नाही. जुन्या योजनेतून शहराला आजही पाणी पुरवठा होत आहे. परंतु अनेक ठिकाणी या योजनेचे पाईप सडले आहेत. त्यामुळे दूषित पाणी पाईपमध्ये शिरते. तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागते. त्यातून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक नव्या वसाहतीपर्यंत नळयोजनेचे पाणी न पोहचल्यामुळे नागरिकांना एक तर सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते किंवा घरी उपलब्ध स्त्रोतातून क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यातून नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)गळतीचे प्रमाण ६३ टक्के सन १९६४ मध्ये मंजूर झालेल्या जुन्याच पाणी पुरवठा योजनेतून सध्या चंद्रपूरकरांची तहान भागविली जात आहे. ५० वर्षे जुन्या असलेल्या या योजनेचे पाईप अनेक ठिकाणी फुटले आहेत. त्यातून ६३ टक्के पाण्याची गळती होत असून ते पाणी वाया जात आहे. वितरण व्यवस्था पांगळीचंद्रपूर शहरासाठी एक लाख क्युबीक मिटरचा पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र वितरण व्यवस्थाच पांगळी असल्याने या पाणी साठ्याची उचल करण्यासाठी मनपा प्रशासन हतबल ठरत आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेल्या पाईपपैकी उर्वरित पाईप जरी महानगर पालिकेला परत केले तरी या समस्येचे निवारण होऊ शकते. आता ‘अमृत कलश’कडे लक्षचंद्रपूर शहरासाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्चाची ‘अमृत कलश’ योजना कार्यान्वित करण्याचा घाट सध्या शासकीय पातळीवर सुरू आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याची समस्या सुटू शकते. केंद्र आणि राज्य सरकारची ही संयुक्त योजना आहे. त्यात मनपाचा २० टक्के सहभाग राहणार आहे. परंतु ३८ कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजनाच १७ वर्षानंतरही पुर्णत्वास जाऊ शकली नाही, तर ही नवी योजना पूर्णत्वास जाईल का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.