शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

चंद्रपूरकरांच्या जलपूर्तीसाठी ‘अमृत ’ योजना

By admin | Updated: May 27, 2016 01:10 IST

शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून भविष्यातील

आज नागपुरात बैठक : उर्जामंत्र्यांपुढे मांडणार आराखडाचंद्रपूर : शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून भविष्यातील पेयजलाच्या नियोजनासाठी अमृत योजना तयार करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आमदार नाना श्यामकुळे यांनी यात पुढाकार घेवून बुधवारी जलसंपदा मंत्री चंद्रपुरात आले असता ही योजना त्यांनी आग्रहाने मांडली आणि मंजुरीही मिळवून घेतली आहे. असे असले तरी ज्या ईरई धरणातून चंद्रपूरकरांसाठी पाणी घेतले जाते ते धरण उर्जा विभागाच्या अखत्यारित येत असल्याने या अमृत योजनेपुढे पेच ठाकला आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी शुक्रवारी नागपुरात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत या योजनेसंदर्भातील आराखडा ठेवला जाणार आहे.चंद्रपूरकरांसाठी ईरइ धरण हेच पाण्याचे एकमेव स्त्रोत आहे. उर्जा विभागाने यातील अधिकचा जलसाठा चंद्रपूरसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला नाही तर शहरावर मोठे जलसंकट ओढावू शकते. हे लक्षात घेवूनच भविष्यात २०४८ या वर्षी असणारी चंद्रपूर शहराची लोकसंख्या गृहित धरून ‘अमृत योजना’ तयार करण्यात आली आहे. २०४८ मध्ये गृहित धरलेल्या ५ लाख ३३ हजार ७७७ लोकसंख्येच्या हिशेबाने वर्षाला ३२ क्युबिक मिटर पाणी आरक्षित करण्याची गरज आहे. सध्याच्या आरक्षित पाण्यापेक्षा ते १६.३२ ने अधिक असणार आहे. या विषयावर २७ मे रोजी नागपुरात उर्जामंत्र्यांसोबत महापौर राखी कंचर्लावार आणि मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांची बैठक होत आहे. यात आराखडा सादर करून मान्यतेसाठी विनंती केली जाणार आहे. राज्याचे उर्जामंत्री काय निर्णय घेतात, हे आता महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जलसंपदा मंत्र्यांची मंजुरी२५ मे रोजी चंद्रपुरात झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चंद्रपूर शहराचे मुख्य जलस्त्रोत ईरई नदी असल्याने या शहरासाठी भविष्यातील पेयजलाच्या तरतुदीची नैतिक जबाबदारीही उर्जाविभागाची आहे, असा दावा करण्यात आला आहे.सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील पाणी वापराचा सीटीपीएसपुढे पर्यायचंद्रपूरकरांना अधिकचे पाणी मिळावे यासाठी उपाय योजण्याची गरज आहे. हे लक्षात घेवून चंद्रपुरातील दोन्ही सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील पाणी शुद्ध करून सीटीपीएसकरिता वापराला देण्याचा पर्याय पुढे आला आहे. मनपाच्या आयुक्तांनी महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना या संदर्भात पत्र लिहिले असून तसा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे ईरइ धरणावरील पाण्याचा कितीतरी भार वाचू शकेल, असा पर्याय आहे. नागपूर मनपाच्या धर्तीवर सीटीपीएसने चंद्रपूर मनपासोबत करार केल्यास हे शक्य होईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. ४५ एमएलडी क्षमतेचा पठानपुरा सिवेज ट्रीटमेंट प्लँट सप्टेंबर-२०१६ पर्यंत तर, ७० एमएलडी क्षमतेचा रहमतनगर सिवेज ट्रीटमेंट प्लँट आॅक्टोबर-२०१६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.