शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

ही तर मासोळ्यांची सामूहिक आत्महत्याच

By admin | Updated: January 5, 2016 01:29 IST

वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात

सास्ती : वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर प्राणी मृत झाल्याची घटना १२-१३ नोव्हेंबरला घडली. या संदर्भात तक्रारीही झाल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर ३-४ दिवसानंतर म्हणजे १६ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाकडून चौकशी करण्यात आली व पालकमंत्र्यांना अहवालही दिल्या गेला. त्यात मात्र रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी कारखान्यातून सोडल्या जात नाही तर मासेही मृत झाले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चौकशीवर आक्षेप दर्शवित बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश खरबडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला खुले पत्र लिहीले.बिल्ट पेपर उद्योगातील रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे १२-१३ नोव्हेंबर रोजी शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर हजारो जलचर प्राणी मृत्यूच्या छायेत होते. त्यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच काही नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर घटनेची चौकशी ३-४ दिवसानंतर केली. त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना पाठविला. परंतु सदर अहवाल पूर्णपणे कारखान्याची पाठराखण करणारा व पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा वाटत असल्याने बल्लारपूर येथील निलेश खरबडे यांनी खुले पत्र लिहून चौकशीवर आक्षेप नोंदविला.घटनेच्या ३-४ दिवसानंतर मृत मासे नदीत आपले वाट पाहतील, अशी अपेक्षा प्रदूषण मंडळाची असावी. घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावरही सदर उद्योग समुह त्यांच्या चुकीचे प्रमाण मागे सोडतील, असे ही प्रदूषण मंडळाला वाटल्याचे दिसते. शेवटी याबाबत आपला निष्कर्ष खराच असणार. कारण आपण या विषयाचे जाणकार तज्ज्ञ आहात. याबाबत अंकुश ठेवणारे अधिकारीसुद्धा आहात. आम्हा सामान्य नागरिकांच्या ज्ञानाप्रमाणे कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याने ही घटना घडली असावी, असा आमचा गैरसमज झाला. या गैरसमाजापोटी नाहक आपल्या विभागास पाहणीचे कष्ट करावे लागले. यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राहीला प्रश्न मेलेल्या माश्यांचा तर त्यांनी सामुहिकरित्या आत्महत्याच केली असावी, असे समजण्यास हरकत नसल्याचे निलेश पांडरंग खरबडे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला लिहीलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालावर अनेकांनी आक्षेप नोंदवित केलेल्या चौकशीची फेरचौकशी करून त्यात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)