शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

ही तर मासोळ्यांची सामूहिक आत्महत्याच

By admin | Updated: January 5, 2016 01:29 IST

वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात

सास्ती : वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर प्राणी मृत झाल्याची घटना १२-१३ नोव्हेंबरला घडली. या संदर्भात तक्रारीही झाल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर ३-४ दिवसानंतर म्हणजे १६ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाकडून चौकशी करण्यात आली व पालकमंत्र्यांना अहवालही दिल्या गेला. त्यात मात्र रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी कारखान्यातून सोडल्या जात नाही तर मासेही मृत झाले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चौकशीवर आक्षेप दर्शवित बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश खरबडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला खुले पत्र लिहीले.बिल्ट पेपर उद्योगातील रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे १२-१३ नोव्हेंबर रोजी शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर हजारो जलचर प्राणी मृत्यूच्या छायेत होते. त्यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच काही नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर घटनेची चौकशी ३-४ दिवसानंतर केली. त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना पाठविला. परंतु सदर अहवाल पूर्णपणे कारखान्याची पाठराखण करणारा व पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा वाटत असल्याने बल्लारपूर येथील निलेश खरबडे यांनी खुले पत्र लिहून चौकशीवर आक्षेप नोंदविला.घटनेच्या ३-४ दिवसानंतर मृत मासे नदीत आपले वाट पाहतील, अशी अपेक्षा प्रदूषण मंडळाची असावी. घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावरही सदर उद्योग समुह त्यांच्या चुकीचे प्रमाण मागे सोडतील, असे ही प्रदूषण मंडळाला वाटल्याचे दिसते. शेवटी याबाबत आपला निष्कर्ष खराच असणार. कारण आपण या विषयाचे जाणकार तज्ज्ञ आहात. याबाबत अंकुश ठेवणारे अधिकारीसुद्धा आहात. आम्हा सामान्य नागरिकांच्या ज्ञानाप्रमाणे कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याने ही घटना घडली असावी, असा आमचा गैरसमज झाला. या गैरसमाजापोटी नाहक आपल्या विभागास पाहणीचे कष्ट करावे लागले. यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राहीला प्रश्न मेलेल्या माश्यांचा तर त्यांनी सामुहिकरित्या आत्महत्याच केली असावी, असे समजण्यास हरकत नसल्याचे निलेश पांडरंग खरबडे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला लिहीलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालावर अनेकांनी आक्षेप नोंदवित केलेल्या चौकशीची फेरचौकशी करून त्यात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)