शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ही तर मासोळ्यांची सामूहिक आत्महत्याच

By admin | Updated: January 5, 2016 01:29 IST

वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात

सास्ती : वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर प्राणी मृत झाल्याची घटना १२-१३ नोव्हेंबरला घडली. या संदर्भात तक्रारीही झाल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर ३-४ दिवसानंतर म्हणजे १६ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाकडून चौकशी करण्यात आली व पालकमंत्र्यांना अहवालही दिल्या गेला. त्यात मात्र रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी कारखान्यातून सोडल्या जात नाही तर मासेही मृत झाले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चौकशीवर आक्षेप दर्शवित बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश खरबडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला खुले पत्र लिहीले.बिल्ट पेपर उद्योगातील रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे १२-१३ नोव्हेंबर रोजी शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर हजारो जलचर प्राणी मृत्यूच्या छायेत होते. त्यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच काही नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर घटनेची चौकशी ३-४ दिवसानंतर केली. त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना पाठविला. परंतु सदर अहवाल पूर्णपणे कारखान्याची पाठराखण करणारा व पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा वाटत असल्याने बल्लारपूर येथील निलेश खरबडे यांनी खुले पत्र लिहून चौकशीवर आक्षेप नोंदविला.घटनेच्या ३-४ दिवसानंतर मृत मासे नदीत आपले वाट पाहतील, अशी अपेक्षा प्रदूषण मंडळाची असावी. घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावरही सदर उद्योग समुह त्यांच्या चुकीचे प्रमाण मागे सोडतील, असे ही प्रदूषण मंडळाला वाटल्याचे दिसते. शेवटी याबाबत आपला निष्कर्ष खराच असणार. कारण आपण या विषयाचे जाणकार तज्ज्ञ आहात. याबाबत अंकुश ठेवणारे अधिकारीसुद्धा आहात. आम्हा सामान्य नागरिकांच्या ज्ञानाप्रमाणे कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याने ही घटना घडली असावी, असा आमचा गैरसमज झाला. या गैरसमाजापोटी नाहक आपल्या विभागास पाहणीचे कष्ट करावे लागले. यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राहीला प्रश्न मेलेल्या माश्यांचा तर त्यांनी सामुहिकरित्या आत्महत्याच केली असावी, असे समजण्यास हरकत नसल्याचे निलेश पांडरंग खरबडे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला लिहीलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालावर अनेकांनी आक्षेप नोंदवित केलेल्या चौकशीची फेरचौकशी करून त्यात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)