शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

ब्रह्मपुरी नगर पालिकेत आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: July 15, 2015 01:13 IST

तालुक्यात पाऊसाची सर्वानांच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत.

विकास कामांकडे दुर्लक्ष : युतीचा वाद चव्हाट्यावरब्रह्मपुरी : तालुक्यात पाऊसाची सर्वानांच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत. पण ब्रह्मपुरीच्या नगरपालिकेत मात्र आरोप -प्रत्यारोपाचा पाऊस गेल्या आठ दिवसांपासून सुरु असल्याने ब्रह्मपुरीची जनता ऱ्हाऊन निघाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.येथील नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे १०, स्वतंत्रविकास आघाडीचे ९ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापत करताना भारतीय जनता पार्टी व स्वतंत्र विकास आघाडीची युती होऊन विरोधी पक्ष संपुष्ठात आणल्या गेले. जनतेला या निर्णयाचे मोठे कौतुक वाटायला लागले व विकासाच्या अपेक्षाही भोळी जनता मनात ठेवू लागली. सत्ता स्थापनेनंतर काही काळ गुण्यागोविंदाने गेली. परंतु अचानकच कुठे माशी शिकंली हे कळेनासे झाले व आरोप प्रत्यारोपांचा ऐन पावसाळ्यातच पाऊस पडत असल्याने नागरिक ओले चिंब झाले आहेत. पाच प्रभागापैकी लॉटरी लागावी असे एकाच पक्षाचे उमेदवार प्रभाग १, २ व ३ मध्ये निवडणून आले. व विकास निधी या मुद्द्यावरुन आरोप- प्रत्यारोप सुरु झाले. सभागृहातील मुद्दे बाहेर येऊ लागल्याने जनतेला धक्के बसू लागले आहे. कारण २० वर्षाच्या पालिकेच्या इतिहासात असे झाले नाही. त्यामुळे जनतेला नवीन प्रकार पाहावयास मिळत आहे. जनता विकासासाठी आसुसलेली आहे. जनतेला या आरोपांचे काहीच देणे घेणे नाही. परंतु नगरपरिषदेची वाहवा अशा माध्यामातून वाढण्याऐवजी खालावत जाण्याचा प्रकार होऊ शकतो, हे सर्वानी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच गुंठेवारी प्रकरणाने नगर परिषदेची पत गेली आहे आणि पुन्हा या वादाच्या पावसाने पालिका धूऊन निघत असल्याने जनतेने कोणाला न्याय मागावा, हा मोठा प्रश्न आहे. विकासाच्या कामात सर्वानी हातभार लावण्यामध्ये ब्रह्मपुरीकर मागे नाही. तेवढी मानसिकता आजही जिवंत आहे. मात्र चूक कोणाची व बरोबर कोणाचे हे पाहिले जात नाही. तरीपण असे का होत आहे, असा गहन प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. सत्ता स्थापनेवेळी जे ठरले असेल त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. त्यासाठी तडजोड महत्वाची आहे. त्या तडजोडीला मोठी तडा आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून झाली तर जनतेची स्वप्ने भंग होतील व पुन्हा जनतेला मते मागताना उत्तरे देता येणार नाही. (प्रतिनिधी)