शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:35 IST

यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्दे४७ मामा तलावही ओव्हरफ्लो : सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अकरापैकी अकराही सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील ५१ पैकी ४७ मामा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. ३७ लघू प्रकल्पापैकी ३१ प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पुढे सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे.यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.अशातच जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संततधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही चांगला पाऊस पडला. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील चंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, अमलनाला, पकडीगुड्डम, लालनाला या अकराही सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत शंभर टक्के जलसाठा आहे.इतर प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठाचंद्रपूर जिल्ह्यात ३७ लघू प्रकल्प आहेत. यातील ३१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय ४७ मामा तलावही शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होत आहे. म्हणजेच जिल्ह्यात ९८ प्रकल्पापैकी ८८ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :agricultureशेती