शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:35 IST

यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्दे४७ मामा तलावही ओव्हरफ्लो : सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अकरापैकी अकराही सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील ५१ पैकी ४७ मामा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. ३७ लघू प्रकल्पापैकी ३१ प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पुढे सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे.यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.अशातच जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संततधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही चांगला पाऊस पडला. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील चंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, अमलनाला, पकडीगुड्डम, लालनाला या अकराही सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत शंभर टक्के जलसाठा आहे.इतर प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठाचंद्रपूर जिल्ह्यात ३७ लघू प्रकल्प आहेत. यातील ३१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय ४७ मामा तलावही शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होत आहे. म्हणजेच जिल्ह्यात ९८ प्रकल्पापैकी ८८ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :agricultureशेती