शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:35 IST

यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्दे४७ मामा तलावही ओव्हरफ्लो : सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अकरापैकी अकराही सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील ५१ पैकी ४७ मामा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. ३७ लघू प्रकल्पापैकी ३१ प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पुढे सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे.यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.अशातच जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संततधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही चांगला पाऊस पडला. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील चंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, अमलनाला, पकडीगुड्डम, लालनाला या अकराही सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत शंभर टक्के जलसाठा आहे.इतर प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठाचंद्रपूर जिल्ह्यात ३७ लघू प्रकल्प आहेत. यातील ३१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय ४७ मामा तलावही शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होत आहे. म्हणजेच जिल्ह्यात ९८ प्रकल्पापैकी ८८ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

टॅग्स :agricultureशेती