शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात शेती व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: December 7, 2014 22:48 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे.

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. अशातच धानाचे घसरलेले भाव व उत्पादन खर्चात झालेली वाढ, त्यामुळे धान पीक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे खचलेल्या व आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने खचलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येकडे न वळता शेतकऱ्यांत हिंमत यावी यासाठी विविध पॅकेज देण्यात आले. तरीही विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता शासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव दिला तरत शेतकरी सावरू शकतो, अशी स्थिती आहे. सध्या सिंदेवाही तालुक्यात श्रीराम धानाला एक हजार ९०० रुपये प्रती क्विंटल भाव आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये श्रीराम धानाला दोन हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. महाराष्ट्र शासनाने धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाव द्यावे अशी विदर्भातील शेतकऱ्यांची मागणी होती. यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळणारच नाही. परिणामी शेतकरी हतबल होईल. तीन वर्षांमध्ये बियाणे, किटकनाशक औषधी, रासायनिक खताच्या उत्पादन खर्चात तीन पटीने वाढ झाली. अशातच धानाला कमी भाव मिळत असल्यामुळे दरवर्षी शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी शेतकऱ्यांना गायी-बैल व अंगावरील सोन्याचे दागदागिने विकण्याची पाळी आली आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, महिला-पुरूष बचत गटाकडून कर्ज काढले आणि धान पिकाची रोवणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला तलावाचे - नहराचे पाणी मिळाले नाही. याशिवाय निसर्गाने शेतकऱ्यांवर प्रहार करून धान पिकावर खोडकिडा, मावा-तुडतुडा, लष्करी अळी, करपा अशा असंख्य रोगाचा प्रादूर्भाव झाला. रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मोठ्या संघर्षातून निसर्गाशी दोन हात करून शेतीत डौलदार धानपिक उभे केले. काही प्रमाणात धानाची मळणी झाली. एकरी २० ते २५ हजारांचा खर्च करून एक हजार ८०० ते एक हजार ९०० रुपये धानाचा भाव पाहून पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त व हतबल झाला. आता काय करावे, काय नाही. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत या परिसरातील धान उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने धानाचे हमी भाव वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)