शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सिंदेवाही तालुक्यात शेती व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: December 7, 2014 22:48 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे.

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. अशातच धानाचे घसरलेले भाव व उत्पादन खर्चात झालेली वाढ, त्यामुळे धान पीक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे खचलेल्या व आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने खचलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येकडे न वळता शेतकऱ्यांत हिंमत यावी यासाठी विविध पॅकेज देण्यात आले. तरीही विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता शासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव दिला तरत शेतकरी सावरू शकतो, अशी स्थिती आहे. सध्या सिंदेवाही तालुक्यात श्रीराम धानाला एक हजार ९०० रुपये प्रती क्विंटल भाव आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये श्रीराम धानाला दोन हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. महाराष्ट्र शासनाने धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाव द्यावे अशी विदर्भातील शेतकऱ्यांची मागणी होती. यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळणारच नाही. परिणामी शेतकरी हतबल होईल. तीन वर्षांमध्ये बियाणे, किटकनाशक औषधी, रासायनिक खताच्या उत्पादन खर्चात तीन पटीने वाढ झाली. अशातच धानाला कमी भाव मिळत असल्यामुळे दरवर्षी शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी शेतकऱ्यांना गायी-बैल व अंगावरील सोन्याचे दागदागिने विकण्याची पाळी आली आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, महिला-पुरूष बचत गटाकडून कर्ज काढले आणि धान पिकाची रोवणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला तलावाचे - नहराचे पाणी मिळाले नाही. याशिवाय निसर्गाने शेतकऱ्यांवर प्रहार करून धान पिकावर खोडकिडा, मावा-तुडतुडा, लष्करी अळी, करपा अशा असंख्य रोगाचा प्रादूर्भाव झाला. रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मोठ्या संघर्षातून निसर्गाशी दोन हात करून शेतीत डौलदार धानपिक उभे केले. काही प्रमाणात धानाची मळणी झाली. एकरी २० ते २५ हजारांचा खर्च करून एक हजार ८०० ते एक हजार ९०० रुपये धानाचा भाव पाहून पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त व हतबल झाला. आता काय करावे, काय नाही. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत या परिसरातील धान उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने धानाचे हमी भाव वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)