यात उद्घाटक तसेच मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांनी काटेकोर शेती पद्धतीचे पालन करून व योग्य नियोजन करून योग्य वेळी लागवड, पेरणी, बियाण्यांचा योग्य वापर, खताचा योग्य वेळी योग्य वापर व तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या उत्पन्नात वाढ करावी, तसेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्रावरून कीटकनाशक खरेदी करताना अगोदर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे यावेळी उदय पाटील यांनी सांगितले. यावेळी.
डॉ. व्ही जी नागदेवते,
रवींद्र मनोहरे,
दिलीप पांगुळ, डॉ. सवाई उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा स्वयंसहायता शेतकरी बचत गट गिरगावचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी तर संचालन पुरुषोत्तम बोरकर यांनी केले.