शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध किसान योजनेसाठी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:22 IST

शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच शुक्रवारी झालेल्या १२ तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.

ठळक मुद्देविकासकामांचा आढावा : पालकमंत्र्यांनी घेतली १२ तासांची मॅराथॉन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच शुक्रवारी झालेल्या १२ तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.समृद्ध किसान कार्यक्रम हा पथदर्शी कार्यक्रम सन २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांच्या कालावधीत दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर हे तीन तालुके, दुसºया टप्प्यात नागभीड, गोंडपिपरी, जिवती तालुक्यात राबविला जाईल. सदर कार्यक्रमामुळे शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आजच्या बैठकीमध्ये आमदार नाना श्यामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपा सभापती राहुल पावडे उपस्थित होते. या योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन, पॉली हाऊस नर्सरी, भाजीपाला लागवड, कृषी यांत्रिकीकरण, समूह सिंचन, सिंचन विहिरीची दुरुस्ती, उपसा सिंचन योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, आदी नावीन्यपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहे.आज आढावा घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेतकरी कर्जमाफी, पाणीटंचाई, जयपूर येथील प्रस्तावित शेतकरी वेल्फेअर ट्रस्टमार्फत राबविण्यात येणारी कामे, जिल्ह्यातील ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाची सद्यस्थिती, विविध योजनांची माहिती, समृद्ध किसान योजना, लोहारा येथील गोरक्षण जागा बाबतची चर्चा, जिल्ह्यातील जिल्हा सैनिक शाळा, बाबूपेठ, राजुरा येथील उड्डाणपूल, मूल, पोंभूर्णा, बल्लारशहा या ठिकाणची क्रीडा संकुल, वन अकादमी इमारतीचे बांधकाम, पोलीस प्रशिक्षण केंद्र, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व महानगरपालिकांच्या वैशिष्टयपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.याशिवाय महाकाली मंदिर परिसराचा विकास, महानगरपालिका मार्फत तयार होत असलेल्या बाबुराव शेडमाके स्टेडियम व ज्युबिली हायस्कूलसाठी देण्यात आलेल्या विशेष निधीचा आढावादेखील घेण्यात आला.या सर्व योजनांची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत करण्याबाबतचे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. त्याबाबतचा अहवाल सातत्याने कळवा, असेही सांगितले.असे आहेत योजनेचे उद्देशसमृद्ध किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करणे, उत्पन्न वाढ होण्यास मदत करून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय शेतकºयांचे समूहगट निर्मिती करणे, बाजाराला जोडलेल्या प्रोडक्शन क्लस्टरची निर्मिती करणे, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीत यांत्रिकीकरण आणि पिकांचे मूल्य वाढविणे, उत्पादित मालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळून देणे, पूरक व्यवसायांची व्हॅल्यू चेन तयार करणे आदी उद्देश या योजनेचे ठेवण्यात आले आहेत.