धानोरा येथील घटना : शेतात नांगरणी करताना घडली घटनाचंद्रपूर : शेतात नांगरणी सुरू असतानाच आलेल्या वादळी वाऱ्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यातच ब्रेक लागला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर नदीत कोळसल्याची घटना धानोरा येथे मंगळवारी ४ वाजताच्या सुमारास घडली.धानोरा येथे एकनाथराव गौरकर यांचे वर्धा नदीला लागूनच शेत आहे. खरिपाचा हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे गौरकर यांनी शेतात नांगरणी सुरू केली. बापूजी दोरखंडे यांच्या मालकीचा एमएच ३४ एपी २०२२ क्रमांकाचा ट्रॅक्टर त्यांनी नांगरणीला लावला होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वातावरण बदलले. विजांचा कडकटाट सुरू झाला. पाऊस येण्याची शक्यता गृहित धरुन चालकाच्या मनात वाहन गावाकडे नेण्याचा विचार सुरू झाला. गावाकडे ट्रॅक्टर नेत असतानाच विजांच्या कडकडाटाने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यातच ब्रेकही लागला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट वर्धा नदीत कोसळले. चालकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच गावकरी नदीकडे आले. सकाळी क्रेन आणि पोकलेन मशीनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर नदीत कोसळला
By admin | Updated: May 6, 2016 01:04 IST