शिक्षण विभाग नरमले : दीड वर्षापासूनच्या मागणीला यशवरोरा : मागील दीड वर्षांपासून शिक्षिकेच्या बदलीकरिता पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून आंदोलन केले. मात्र त्याच्या काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस गेल्या दोन दिवसापासून मुलांना शाळेत पाठविणे बंद केल्याने शिक्षण विभागाने ‘त्या’ शिक्षिकेची बदली केली आहे.वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय भटाळा येथील शिक्षिका इयत्ता ८ वीच्या वर्ग शिक्षिका व इयत्ता ९ व १० वीला विषय शिकवितात. शिक्षिका तासीका घेत नाही, उत्तर पत्रिका तपासून देत नाही. त्यामुळे सदर शिक्षिकेची बदली करावी, याकरीता पालक मागील दीड वर्षांपासून शिक्षण विभागाकडे तक्रारी करून अधिकाऱ्यांच्या भेटी देखील घेतल्या. अनेकवेळा आंदोलन केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. २२ जुलैपासून पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेटून पालकांशी चर्चा केली. २५ जुलैपर्यंत सदर शिक्षिकेची बदली करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत शुकशुकाट होता.याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेत २३ जुलै रोजी शिक्षिकेची बदली करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)शिक्षिका गेल्याशिवाय मुलांना पाठविणार नाहीशिक्षिकेची बदली झाली हे चांगले झाले असले तरी, जोपर्यंत शिक्षिका जि.प. विद्यालय भटाळा येथून जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटले आहे.
अखेर ‘त्या’ शिक्षिकेची बदली
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST