शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

अखेर ‘त्या’ शिक्षिकेची बदली

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

मागील दीड वर्षांपासून शिक्षिकेच्या बदलीकरिता पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून आंदोलन केले.

शिक्षण विभाग नरमले : दीड वर्षापासूनच्या मागणीला यशवरोरा : मागील दीड वर्षांपासून शिक्षिकेच्या बदलीकरिता पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून आंदोलन केले. मात्र त्याच्या काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस गेल्या दोन दिवसापासून मुलांना शाळेत पाठविणे बंद केल्याने शिक्षण विभागाने ‘त्या’ शिक्षिकेची बदली केली आहे.वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय भटाळा येथील शिक्षिका इयत्ता ८ वीच्या वर्ग शिक्षिका व इयत्ता ९ व १० वीला विषय शिकवितात. शिक्षिका तासीका घेत नाही, उत्तर पत्रिका तपासून देत नाही. त्यामुळे सदर शिक्षिकेची बदली करावी, याकरीता पालक मागील दीड वर्षांपासून शिक्षण विभागाकडे तक्रारी करून अधिकाऱ्यांच्या भेटी देखील घेतल्या. अनेकवेळा आंदोलन केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. २२ जुलैपासून पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेटून पालकांशी चर्चा केली. २५ जुलैपर्यंत सदर शिक्षिकेची बदली करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत शुकशुकाट होता.याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेत २३ जुलै रोजी शिक्षिकेची बदली करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)शिक्षिका गेल्याशिवाय मुलांना पाठविणार नाहीशिक्षिकेची बदली झाली हे चांगले झाले असले तरी, जोपर्यंत शिक्षिका जि.प. विद्यालय भटाळा येथून जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटले आहे.