शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिभूमीच्या मातीने दिला प्रशासकीय अधिकारी

By admin | Updated: July 8, 2015 01:21 IST

चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभूमीच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा (पेठ) या लहानशा गावातील एका विद्यार्थ्यांने मोठे यश संपादन केले आहे.

मुक्त विद्यापीठाची पदवी ठरली पाया : केवाडा (पो.) देशाच्या पटलावरराजकुमार चुनारकर खडसंगीचिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभूमीच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा (पेठ) या लहानशा गावातील एका विद्यार्थ्यांने मोठे यश संपादन केले आहे. या क्रांतीभूमीने देशाला एक प्रशासकीय अधिकारी दिल्याने चिमूरचे नाव आणखी एकदा देशाच्या पटलावर आले आहे.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांतीचे नाव आजही अजरामर आहे. याच तालुक्यातील केवाडा (पेठ) या १७३७ लोकसंख्येच्या गावात बालपण गेलेल्या संदीप गोपालदास मोहुर्ले याने युपीएससी परीक्षेत ७३० वा मेरीट येऊन गावाचे नाव देशाच्या पलाटावर आणले आहे. संदीप हा भंडारा जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याने शिक्षकी पेशावरच समाधान न मानता मोठा अधिकारी बनण्याचा चंग बांधला. याकरिता संदीपने मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले व आयएएस परीक्षेच्या दृष्टीने शिक्षकी पेशा सांभाळून परिश्रमास सुरूवात केली. त्याला पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये संदीपने केंद्र शासनाच्या युपीएससी परीक्षेत (७३०) वा मेरीट येऊन प्रशासकीय सेवेत मोठे यश संपादन केले आहे. राष्ट्रसंताची तपोभूमी असलेल्या गोदेडाच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा या लहानशा गावात राहणाऱ्या लक्ष्मण रामजी मोहुर्ले यांना गोपालदास व पटवारी असे दोन अपत्य. त्यापैकी संदीपचे वडील गोपालदास यांना शासकीय नोकरीकरीता गाव सोडावे लागले व ते नोकरीकरिता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे स्थायीक झालेत.संदीप मोहुर्ले यांचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे झाले. त्यानंतर वडसा व गडचिरोली येथून डी.एड. पर्यंत शिक्षण घेतले. डीएडनंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात शिक्षकी पेक्षा स्वीकारला. आज घडीला संदीप लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने संदीपची भेट घेऊन विचारणा केली असता, त्याने सांगितले माझे शिक्षण आदिवाही बहुल जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात झाले. बाबाच्या नोकरीनिमित्त आम्ही बाहेर गेलो असलो तरी बाबाचे जन्मगाव चिमूर तालुक्यातील केवाडा असल्याने या गावाशी माझे नाते आहे. त्यामुळे केवाडा गावाविषयी मला आपुलकी आहे. आजही बाबाची शेती केवाडा येथे असून माझे काका पटवारी मोहुर्ले राहतात. त्यामुळे मी या गावात जात असतो. तेव्हा या गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द असल्याचेही सांगितले. तर गाव खेड्यात सामाजिक समता प्रस्तावित करुन शांतात टिकवण्यासाठी प्रयत्न करून गावखेड्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही संदीपने ‘लोकमत’ला सांगितले.