शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बल्लारपुरात २६ ला आदिवासींची धरणे

By admin | Updated: February 25, 2016 00:57 IST

आदिवासी बांधवांच्या सरकारकडे काही मागण्या असून, त्याबाबत विविध स्तरावर निवेदने देण्यात आलीत.

बल्लारपूर : आदिवासी बांधवांच्या सरकारकडे काही मागण्या असून, त्याबाबत विविध स्तरावर निवेदने देण्यात आलीत. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, आदिवासी बांधवांनी या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.२६ फेब्रुवारीला हे धरणे आदोलन स्थानिक नगर परिषद चौकात दुपारी ११ ते ५ पर्यंत चालणार आहे. आदिवासींच्या मागण्या अशा बल्लारपूर येथील बिरसा मुंडा स्मृतीस्थळाची जागा संस्थेला मिळावी, खांडक्या बल्लारशाह यांच्या समाधी स्थळाची नोंद पुरातत्व विभागाने करावी. तद्वतच बल्लारपूर येथील सांस्कृतिक भवनाला आणि बल्लारशाह रेल्वे स्टेशनला राजे खांडक्या बल्लारशाह असे नाव द्यावे, रमाई घरकुलसारखी आदिवासींच्या विकासार्थ योजना असावी, सुभाष टाकीज जवळील चौकाला क्रांतीवीर नारायण सिंह उईके हे नाव द्यावे. या मागण्यांची माहिती देताना नारायणसिह उईके संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी आदिवासी धर्म स्थापन करीत असल्याचे सांगून त्याची रुपरेषा मांडली. त्याकरिता गडचिरोली येथे नोव्हेंबर महिन्यात सोहळा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत मीनाक्षी गेडाम, सुनील कुमरे, संतोष आत्राम, सत्यभामा आत्राम, लीना कुसराम, ज्योती पेंदोर, दामोदर नेवारे, सुनिल कोवे, कुसूम गेडाम, उमा नैताम, योगेश मडावी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)