शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

विनाकारण उभ्या जड वाहनावर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:22 IST

बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मधातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. अश्यात दररोज या मार्गावर व्यस्त वाहतुकीची वर्दळ असते. परंतु ...

बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मधातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. अश्यात दररोज या मार्गावर व्यस्त वाहतुकीची वर्दळ असते. परंतु या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे ठाणेदार उमेश पाटील यांनी विनाकारण उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाईचे संकेत वाहन मालकास दिले आहे.

बल्लारपुरातील दोन्ही दिशेला उद्योगाचे जाळे असल्यामुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर दिवसभर सिमेंट व फ्लाय ऐश घेऊन जाणाऱ्या जड वाहतुकीची वर्दळ असते. पेपरमिल राममंदिर चौकापासून तर बामणीपर्यंत मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने २४ तास जड वाहने उभे ठेवण्याची फॅशनच झाली आहे. पेपरमिल परिसर,लाकूड डेपोपासून तर बीटीएस प्लेटपर्यंत बामणी परिसर जड वाहने ठाण मांडून उभी राहतात. यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे.तर काही ठिकाणी भंगार वाहने पडून आहे.रस्ते अतिक्रमणाने वेढले आहे.यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या बाजूने उभे राहणारे वाहन हटवा म्हणून अनेकदा शहरातील संघटनांनी पोलीस ठाण्यात निवेदन ही दिले आहे परंतु अजूनही उभ्या ट्रकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

कोट

शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या मालकांची बैठक घेतली असून रस्त्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या वाहन मालकास वाहन न ठेवण्याचे एका आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे नाही हटविल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

= उमेश पाटील,पोलीस निरीक्षक,बल्लारशाह

फोटो सडकेच्या बाजूला उभे असलेली वाहने

= मंगल जीवने