शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

तोंडखुरीची लागण; २५ मेंढ्यांचा मृत्यू

By admin | Updated: August 29, 2016 01:19 IST

गोंडपिपरी तालुुक्यातील तोहोगाव येथे मेंढ्यांना तोंडखुरी रोगाची लागण सुरू असून योग्य उपचाराअभावी दररोज दोन-तीन मेंढ्या मरत आहेत.

तोहोगाव परिसरातील घटना : उपाचाराअभावी दररोज मरतात मेंढ्यातोहोगाव : गोंडपिपरी तालुुक्यातील तोहोगाव येथे मेंढ्यांना तोंडखुरी रोगाची लागण सुरू असून योग्य उपचाराअभावी दररोज दोन-तीन मेंढ्या मरत आहेत. डॉक्टर मात्र आठवड्यातून एकदाच पशु वैद्यकीय रुग्णालयात येत असतात. डॉक्टरच्या गैरहजेरीमुुळे परिचराकडून उपचार सुरू असून आतापर्यंत या परिसरातील मेंढपाळाच्या २५ मेंढ्या मरण पावल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.तोहोगाव या परिसरात सर्वात जास्त पशुधन असल्यामुळे येथे पशु वैद्यकीय रुग्णालय श्रेणी-१ चे रुग्णालय २५ वर्षापासून आहे. या अगोदरचे सर्वच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी निवासी असायचे व पशुधनावर योग्य उपचार करायचे. या रुग्णालयात तीन चतुर्थ कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकारी अशी पदभरती असताना सुद्धा येथे सध्या एक वैद्यकीय अधिकारी व एक परिचर असे दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. येथे कार्यरत डॉक्टर तर आठवड्यातून एकदाच रुग्णालयात येतात. बाकी दिवस फोनवरच परिचराला उपचारासंबंधी सुचना देतात. परिचर फक्त रुग्णालयात आणलेल्या जनावरांवर थातुर-मातुर उपचार करते. तर गंभीर आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी घरी बोलावले तर पैसे घेतल्याशिवाय घरी येवून उपचार करीत नाहीत, असे पशुपालकांचे म्हणणे आहे. येथील मेंढपाळांनी आपल्या बकऱ्या-मेंढ्या पशु वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने या परिचरांनी थातुर-मातुर औषधोपचार केला. त्यांच्या मेंढ्याना कसलाही फायदा झाला नाही. त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तोंडखुरी रोगावर या वैद्यकीय रुग्णालयात औषधच नसल्याचे परिचर सांगत आहे. तोंडखुरीची लागण झालेल्या मेंढ्यांच्या तोंडातून चिकट द्रव पडत असून खाली मान टाकून मेंढी उभी असते. ती काहीच खात नाही. दोन दिवस तशीच राहते व तिसऱ्या दिवशी ती मृत पावते. आजपर्यंत तोहोगाव येथील कविश्वर चिडे यांच्या ९ मेंढ्या, मेघराज चिडे यांचे ७, सुनील चिडे ५, मनोज चिडे यांच्या २ मेंढ्या मरण पावल्या आहेत. शेवटी या मेंढपाळाने तेलंगना राज्यातील कागजनगर येथून औषध विकत आणून खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू केला आहे. काही प्रमाणात तोंडखुरी रोग आटोक्यात आला. परंतु, तेवढी सुधारणा अजुनही झालेली नाही. या गंभीर रोगाकडे शासनाने लक्ष देवून मेंढपाळांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकारिणीने केली आहे. (वार्ताहर)