शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवास व्यवस्थाही योग्य नाही

By admin | Updated: July 22, 2014 23:56 IST

जवाहर नवोदय विद्यालयातील पालकांचा असंतोष लक्षात घेऊन समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने काही पालकांसमवेत भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उपप्राचार्यांकडून तक्रारीची

परिसरात झुडपांचा कहर : प्रशासनाची बनवाबनवीहरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)जवाहर नवोदय विद्यालयातील पालकांचा असंतोष लक्षात घेऊन समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने काही पालकांसमवेत भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उपप्राचार्यांकडून तक्रारीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता. उपप्राचार्य खंडाळे हे गोड बोलनू पालकांची समजूत काढत आहे. उपप्राचार्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना दररोज दुपारी १.४० वाजता जेवण दिले जाते. परंतु रविवारला ३ वाजता जेवण दिले गेले. विद्यार्थ्यांच्या जेवणात वापरण्यात येणारे गूह हे निकृष्ट दर्जाचे असून जेवणात वाढण्यात आलेली पोळी कच्ची व दर्जेदार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांसाठी जेवनात वापरण्यात येणारे गहू व तांदळाची खरेदी खुल्या बाजारातून न करता सरकारी गोदामातून करण्यात आली. गहू सहा रुपये प्रमाणे खरेदी केल्याचे सांगत असले तरी गव्हाचा व तांदळाचा दर्जा नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विद्यालयाला भेट दिली नाही. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी पीटीसी सदस्यासोबत चर्चा केल्याची माहितीप्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी केवळ १७२ पेजेसचे सहा नोटबुक दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाजारातून वह्या व नोटबुक तसेच प्रकल्प साहित्य खरेदी करावे लागते. वाढीव दरानुसार प्रत्येक विद्यार्थ्यामागे याकरिता ४०० रुपये देय असताना हा खर्च प्रत्यक्षात होत नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फळफळावळे, बिस्कीट मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. पीटीसी सदस्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षापासून पीटीसी सभा झालीच नाही. प्रशासन सभा घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. रविवारी विद्यार्थ्यांना १० वाजेपर्यंत आंघोळीकरिता पाणी उपलब्ध झाले नव्हते. मुलीकडील वस्तीगृहातील आरो बंद असून पिण्याचे पाणी टाकीत भरलेच गेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थिंनींना आरोचे शुद्ध पाण्याऐवजी अशुद्ध व क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. शाळेत सत्र १ जुलैला सुरु झाले असूनही विद्यार्थिंनीच्या वस्तीगृहात वार्डनची व्यवस्था करण्यात आली नाही. मागील वर्षात कामावर असलेली वार्डन तीन वर्ष झाले म्हणून कामावरुन काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थिंनींना ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविण्यात येते त्या टाकीत घाण वास येतो. त्यानुसार पालकासमवेत प्रतिनिधींनी पाहणी करण्याची मागणी उपप्राचार्याकडे केली असता विद्यार्थिंनींच्या वसतीगृहात घोरपड घुसल्याचे सांगून उपप्राचार्यानी वेळ मारून नेली. मुलामुलींच्या वस्तीगृहाच्या सभोवताल असलेल्या झुडपांमुळे व झाडांमुळे वसतिगृहात साप व इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. विद्यालयातील वस्तीगृहाचा काही भाग विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य नसला तरी तिथे मुलीना जबरदस्तीने निवास व्यवस्था केली आहे. एकंदरीत पालकांनी केलेल्या तक्रारीत बरीच सत्यता असून शालेय व्यवस्थापक मंडळी मात्र गोड बोलनू पालकांच्या अशिक्षित व गरीबीचा फायदा घेत आहे.