शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

निवास व्यवस्थाही योग्य नाही

By admin | Updated: July 22, 2014 23:56 IST

जवाहर नवोदय विद्यालयातील पालकांचा असंतोष लक्षात घेऊन समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने काही पालकांसमवेत भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उपप्राचार्यांकडून तक्रारीची

परिसरात झुडपांचा कहर : प्रशासनाची बनवाबनवीहरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)जवाहर नवोदय विद्यालयातील पालकांचा असंतोष लक्षात घेऊन समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने काही पालकांसमवेत भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उपप्राचार्यांकडून तक्रारीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता. उपप्राचार्य खंडाळे हे गोड बोलनू पालकांची समजूत काढत आहे. उपप्राचार्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना दररोज दुपारी १.४० वाजता जेवण दिले जाते. परंतु रविवारला ३ वाजता जेवण दिले गेले. विद्यार्थ्यांच्या जेवणात वापरण्यात येणारे गूह हे निकृष्ट दर्जाचे असून जेवणात वाढण्यात आलेली पोळी कच्ची व दर्जेदार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांसाठी जेवनात वापरण्यात येणारे गहू व तांदळाची खरेदी खुल्या बाजारातून न करता सरकारी गोदामातून करण्यात आली. गहू सहा रुपये प्रमाणे खरेदी केल्याचे सांगत असले तरी गव्हाचा व तांदळाचा दर्जा नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विद्यालयाला भेट दिली नाही. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी पीटीसी सदस्यासोबत चर्चा केल्याची माहितीप्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी केवळ १७२ पेजेसचे सहा नोटबुक दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाजारातून वह्या व नोटबुक तसेच प्रकल्प साहित्य खरेदी करावे लागते. वाढीव दरानुसार प्रत्येक विद्यार्थ्यामागे याकरिता ४०० रुपये देय असताना हा खर्च प्रत्यक्षात होत नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फळफळावळे, बिस्कीट मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. पीटीसी सदस्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षापासून पीटीसी सभा झालीच नाही. प्रशासन सभा घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. रविवारी विद्यार्थ्यांना १० वाजेपर्यंत आंघोळीकरिता पाणी उपलब्ध झाले नव्हते. मुलीकडील वस्तीगृहातील आरो बंद असून पिण्याचे पाणी टाकीत भरलेच गेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थिंनींना आरोचे शुद्ध पाण्याऐवजी अशुद्ध व क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. शाळेत सत्र १ जुलैला सुरु झाले असूनही विद्यार्थिंनीच्या वस्तीगृहात वार्डनची व्यवस्था करण्यात आली नाही. मागील वर्षात कामावर असलेली वार्डन तीन वर्ष झाले म्हणून कामावरुन काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थिंनींना ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविण्यात येते त्या टाकीत घाण वास येतो. त्यानुसार पालकासमवेत प्रतिनिधींनी पाहणी करण्याची मागणी उपप्राचार्याकडे केली असता विद्यार्थिंनींच्या वसतीगृहात घोरपड घुसल्याचे सांगून उपप्राचार्यानी वेळ मारून नेली. मुलामुलींच्या वस्तीगृहाच्या सभोवताल असलेल्या झुडपांमुळे व झाडांमुळे वसतिगृहात साप व इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. विद्यालयातील वस्तीगृहाचा काही भाग विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य नसला तरी तिथे मुलीना जबरदस्तीने निवास व्यवस्था केली आहे. एकंदरीत पालकांनी केलेल्या तक्रारीत बरीच सत्यता असून शालेय व्यवस्थापक मंडळी मात्र गोड बोलनू पालकांच्या अशिक्षित व गरीबीचा फायदा घेत आहे.