शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

खरीप हंगामातील पेरणीपूर्वी मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देशिवारात लगबग, बियाणे, खते, घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने पैशाची जुळवाजुळवा करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. यंदाही रबी हंगामातील कापूस व अन्य शेतमालाची विक्री होऊ शकली नाही. या वर्षी राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन पेरा वाढणार आहे. शेतीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाच तालुक्यात ट्रॅक्टरचा वापर वाढलाराजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती व नागभीड तालुक्यात खरीप हंगामाची कामे करण्यासाठी यंदा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. बैलाचा वापर करून वखरणी, नांगणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे केली जातात. पण, गाय, बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. हंगामासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे काही शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून मशागतीची कामे करीत आहेत.शेणखताचे दर वधारलेकाही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरांची संख्या बरीच होती. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी चांगले बैल मिळायचे. गाशी म्हशींमुळे उत्तम दर्जाचा खत उपलब्ध व्हायचा. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. पाळीव जनावरे नसल्याने शेणखत मिळणे कठीण झाले. त्यामुळे पिकांच्या पोषणासाठी शेतकरी इतरांकडून शेण खताची खरेदी करतात. त्यामुळे यंदा शेण खताचे दर वाढले आहेत.

टॅग्स :agricultureशेती