शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

खरीप हंगामातील पेरणीपूर्वी मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देशिवारात लगबग, बियाणे, खते, घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने पैशाची जुळवाजुळवा करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. यंदाही रबी हंगामातील कापूस व अन्य शेतमालाची विक्री होऊ शकली नाही. या वर्षी राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन पेरा वाढणार आहे. शेतीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाच तालुक्यात ट्रॅक्टरचा वापर वाढलाराजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती व नागभीड तालुक्यात खरीप हंगामाची कामे करण्यासाठी यंदा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. बैलाचा वापर करून वखरणी, नांगणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे केली जातात. पण, गाय, बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. हंगामासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे काही शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून मशागतीची कामे करीत आहेत.शेणखताचे दर वधारलेकाही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरांची संख्या बरीच होती. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी चांगले बैल मिळायचे. गाशी म्हशींमुळे उत्तम दर्जाचा खत उपलब्ध व्हायचा. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. पाळीव जनावरे नसल्याने शेणखत मिळणे कठीण झाले. त्यामुळे पिकांच्या पोषणासाठी शेतकरी इतरांकडून शेण खताची खरेदी करतात. त्यामुळे यंदा शेण खताचे दर वाढले आहेत.

टॅग्स :agricultureशेती