शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

१५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरूवातीला कर्जमुक्तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजनेची गती संथ : बँक खाती निरंक न झाल्याने खरीप कर्जासाठी चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या, अशा शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य सरकारने घेऊन खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज देण्याचा निर्देश जारी केला. मात्र, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडल्याने सुमारे १५ हजार शेतकऱ्यांची बँक खाती अद्याप निरंक झाली नाही. त्यामुळे असे शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरूवातीला कर्जमुक्तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती. टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याही प्रकाशित केल्या. मात्र, मार्चच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच लॉकडाऊन लागू झाले. परिणामी प्रक्रिया ठप्प झाली. प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, याची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांची मान्यता घेणे हा आहे. विशिष्ट क्रमांकासह यादीत नाव असलेल्या शेतकऱ्याने नावासमोरील विशिष्ट क्रमाक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा अथवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.बँकांचा कर्ज प्राधान्यक्रम अन्यायकारकचंद्रपूर जिल्ह्यात कर्जमुक्तीची थंडावली आहे. पात्र असूनही बँकेची खाती निरंक न झाल्याचा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसण्याची शक्यता आहे. कर्जमुक्त न झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा आदेश जारी केला. मात्र, जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकांचा अपवाद वगळल्यास राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज देण्याचा प्राधान्यक्रम हा नियमित कर्जदार, कर्जमुक्त झालेला शेतकरी आणि त्यानंतर उर्वरित शेतकरी असा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहू शकतात.कर्जासाठी आधार प्रमाणिकरण का?आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तर ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकऱ्यांना आपला आधार प्रमाणिकरण पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच ही प्रक्रिया अंतिम होते. पीक कर्जासाठी हे प्रमाणीकरण महत्त्वपूर्ण पुरावा आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड