शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

१५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरूवातीला कर्जमुक्तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजनेची गती संथ : बँक खाती निरंक न झाल्याने खरीप कर्जासाठी चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या, अशा शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य सरकारने घेऊन खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज देण्याचा निर्देश जारी केला. मात्र, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडल्याने सुमारे १५ हजार शेतकऱ्यांची बँक खाती अद्याप निरंक झाली नाही. त्यामुळे असे शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरूवातीला कर्जमुक्तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती. टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याही प्रकाशित केल्या. मात्र, मार्चच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच लॉकडाऊन लागू झाले. परिणामी प्रक्रिया ठप्प झाली. प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, याची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांची मान्यता घेणे हा आहे. विशिष्ट क्रमांकासह यादीत नाव असलेल्या शेतकऱ्याने नावासमोरील विशिष्ट क्रमाक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा अथवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.बँकांचा कर्ज प्राधान्यक्रम अन्यायकारकचंद्रपूर जिल्ह्यात कर्जमुक्तीची थंडावली आहे. पात्र असूनही बँकेची खाती निरंक न झाल्याचा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसण्याची शक्यता आहे. कर्जमुक्त न झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा आदेश जारी केला. मात्र, जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकांचा अपवाद वगळल्यास राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज देण्याचा प्राधान्यक्रम हा नियमित कर्जदार, कर्जमुक्त झालेला शेतकरी आणि त्यानंतर उर्वरित शेतकरी असा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहू शकतात.कर्जासाठी आधार प्रमाणिकरण का?आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तर ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकऱ्यांना आपला आधार प्रमाणिकरण पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच ही प्रक्रिया अंतिम होते. पीक कर्जासाठी हे प्रमाणीकरण महत्त्वपूर्ण पुरावा आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड