शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

९५० चालक-वाहकांचा रोज २० हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST

कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद ...

कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद असलेल्या बहुतांश बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, प्रवाशांची संख्याही वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा हे चार आगार असून, या आगारातून सुमारे २२५ बसच्या १४०५ बसफेऱ्या ८० हजार कि.मी. धावतात. ५८३ बसचालक, तर ३६७ वाहक कर्तव्य बजावतात. या वाहक, चालकांचा दररोज सुमारे २० हजारांच्या जवळपास नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, याची कुठलीही तपासणी होत नसल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

२० हजार प्रवशांचा रोज प्रवास

चंद्रपूर जिल्ह्यात चार आगारांतून २२५ बसेस धावतात. दररोज साधरणत: ८० हजार कि.मी.चा प्रवास करतात. यामध्ये साधरण २० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी काळजी घेत आहेत. चालक-वाहकसुद्धा आपली काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

तपासणीच नाही

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक व वाहकांची राज्य परिवहन महामंडळाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. लगतच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील प्रवासी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा वाहक, चालकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत राज्य परिवहन महामंडळ गंभीर नसल्याचे दिसून येते.

बॉक्स

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एस. टी. चालक वाहकांना लस देण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांची लस देण्याची मागणी आहे. परंतु, अधिकृतरीत्या मागणीचे निवेदन देण्यात आले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांचा अजूनही विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अध्याप मिळाले नाही.

बॉक्स

मास्क, सॅनिटायझर नसल्याने गैरसोय

चालकांना मास्क, सॅनिटायझर पुरविल्या जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चालक व वाहकांना स्वत:लाच व्यवस्था करावी लागत आहे. त्यातील काहीजण मास्क वापरताना काहीजण रूमाल वापरताना, तर काहीजण कसलाच वापर करीत नसून त्याच स्थितीत तिकीट फाडताना आढळून येतात.

कोट

दररोज आमचा हजारो नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, अद्यापही आम्हाला लसीकरण दिले नाही, तसेच मास्क व सॅनिटायझर पुरविले नाही. परजिल्ह्यात बसफेऱ्या धावत असल्याने वाहक, चालकांना लसीकरण गरजेचे आहे.

-दत्ता बावणे,

विभागीय सचिव, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना

----

सुरुवातीला एकादा मास्क दिले तेव्हापासून आतापर्यंत मास्क पुरविले नाही. निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु, दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असूनही लसीकरणाबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही.

संजय सोमनकर

विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना