शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

९५० चालक-वाहकांचा रोज २० हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST

कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद ...

कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद असलेल्या बहुतांश बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, प्रवाशांची संख्याही वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा हे चार आगार असून, या आगारातून सुमारे २२५ बसच्या १४०५ बसफेऱ्या ८० हजार कि.मी. धावतात. ५८३ बसचालक, तर ३६७ वाहक कर्तव्य बजावतात. या वाहक, चालकांचा दररोज सुमारे २० हजारांच्या जवळपास नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, याची कुठलीही तपासणी होत नसल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

२० हजार प्रवशांचा रोज प्रवास

चंद्रपूर जिल्ह्यात चार आगारांतून २२५ बसेस धावतात. दररोज साधरणत: ८० हजार कि.मी.चा प्रवास करतात. यामध्ये साधरण २० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी काळजी घेत आहेत. चालक-वाहकसुद्धा आपली काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

तपासणीच नाही

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक व वाहकांची राज्य परिवहन महामंडळाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. लगतच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील प्रवासी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा वाहक, चालकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत राज्य परिवहन महामंडळ गंभीर नसल्याचे दिसून येते.

बॉक्स

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एस. टी. चालक वाहकांना लस देण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांची लस देण्याची मागणी आहे. परंतु, अधिकृतरीत्या मागणीचे निवेदन देण्यात आले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांचा अजूनही विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अध्याप मिळाले नाही.

बॉक्स

मास्क, सॅनिटायझर नसल्याने गैरसोय

चालकांना मास्क, सॅनिटायझर पुरविल्या जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चालक व वाहकांना स्वत:लाच व्यवस्था करावी लागत आहे. त्यातील काहीजण मास्क वापरताना काहीजण रूमाल वापरताना, तर काहीजण कसलाच वापर करीत नसून त्याच स्थितीत तिकीट फाडताना आढळून येतात.

कोट

दररोज आमचा हजारो नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, अद्यापही आम्हाला लसीकरण दिले नाही, तसेच मास्क व सॅनिटायझर पुरविले नाही. परजिल्ह्यात बसफेऱ्या धावत असल्याने वाहक, चालकांना लसीकरण गरजेचे आहे.

-दत्ता बावणे,

विभागीय सचिव, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना

----

सुरुवातीला एकादा मास्क दिले तेव्हापासून आतापर्यंत मास्क पुरविले नाही. निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु, दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असूनही लसीकरणाबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही.

संजय सोमनकर

विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना