शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

९१ ग्रामपंचायतींकडून अनियमित जलशुद्धीकरण

By admin | Updated: December 23, 2015 01:07 IST

पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी

नागरिकांच्या आरोग्याला धोका : आरोग्य विभागाच्या अहवालातील वास्तवमंगेश भांडेकर चंद्रपूरपिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून पाणी पुरवठा करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी हे जीवन आहे. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण केंद्रासाठी शासनाने निधीही दिला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाणी नमूने तपासणीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी पाणी नमून्यांची तपासणी केली जाते. यात दूषित पाणी नमूने आढळलेल्या ग्रामपंचायतींना कळविले जाते. मात्र अनेक ग्रामपंचायती यानंतरही पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती अनियमीत पाणी शुद्धीकरण करीत असल्याचे म्हटले आहे. यात सर्वाधिक ग्रामपंचायती नागभीड तालुक्यातील आहेत. तर घुग्घुस, दुर्गापूर, पोंभुर्णा या मोठ्या ग्रामपंचायतीही गावाला पुरवठा करणाऱ्या पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे म्हटले आहे. दूषित पाणी पिल्याने विविध आजाराची लागण होत असते. असे प्रकार यापूर्वी अनेक गावात घडले आहेत. अनेकदा नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात नारू आढळल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र तरीही पाण्याचे नियमीत निर्जतुंकीरण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष पसरला आहे.