शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

९१ ग्रामपंचायतींकडून अनियमित जलशुद्धीकरण

By admin | Updated: December 23, 2015 01:07 IST

पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी

नागरिकांच्या आरोग्याला धोका : आरोग्य विभागाच्या अहवालातील वास्तवमंगेश भांडेकर चंद्रपूरपिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून पाणी पुरवठा करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी हे जीवन आहे. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण केंद्रासाठी शासनाने निधीही दिला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाणी नमूने तपासणीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी पाणी नमून्यांची तपासणी केली जाते. यात दूषित पाणी नमूने आढळलेल्या ग्रामपंचायतींना कळविले जाते. मात्र अनेक ग्रामपंचायती यानंतरही पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती अनियमीत पाणी शुद्धीकरण करीत असल्याचे म्हटले आहे. यात सर्वाधिक ग्रामपंचायती नागभीड तालुक्यातील आहेत. तर घुग्घुस, दुर्गापूर, पोंभुर्णा या मोठ्या ग्रामपंचायतीही गावाला पुरवठा करणाऱ्या पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे म्हटले आहे. दूषित पाणी पिल्याने विविध आजाराची लागण होत असते. असे प्रकार यापूर्वी अनेक गावात घडले आहेत. अनेकदा नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात नारू आढळल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र तरीही पाण्याचे नियमीत निर्जतुंकीरण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष पसरला आहे.