शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

९१ ग्रामपंचायतींकडून अनियमित जलशुद्धीकरण

By admin | Updated: December 23, 2015 01:07 IST

पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी

नागरिकांच्या आरोग्याला धोका : आरोग्य विभागाच्या अहवालातील वास्तवमंगेश भांडेकर चंद्रपूरपिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून पाणी पुरवठा करणे हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी हे जीवन आहे. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण केंद्रासाठी शासनाने निधीही दिला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाणी नमूने तपासणीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी पाणी नमून्यांची तपासणी केली जाते. यात दूषित पाणी नमूने आढळलेल्या ग्रामपंचायतींना कळविले जाते. मात्र अनेक ग्रामपंचायती यानंतरही पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ९१ ग्रामपंचायती अनियमीत पाणी शुद्धीकरण करीत असल्याचे म्हटले आहे. यात सर्वाधिक ग्रामपंचायती नागभीड तालुक्यातील आहेत. तर घुग्घुस, दुर्गापूर, पोंभुर्णा या मोठ्या ग्रामपंचायतीही गावाला पुरवठा करणाऱ्या पाण्याचे अनियमीत निर्जतुंकीरण करीत असल्याचे म्हटले आहे. दूषित पाणी पिल्याने विविध आजाराची लागण होत असते. असे प्रकार यापूर्वी अनेक गावात घडले आहेत. अनेकदा नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात नारू आढळल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र तरीही पाण्याचे नियमीत निर्जतुंकीरण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष पसरला आहे.