शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

चंद्रपुरात ८२ हजार घरे, अधिकृत नळधारक फक्त ३५ हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

चंद्रपूर : २०११ च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ३ लाख २१ हजार आहे. घरांची संख्या ८२ हजाराहून अधिक झाली. मात्र, ...

चंद्रपूर : २०११ च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ३ लाख २१ हजार आहे. घरांची संख्या ८२ हजाराहून अधिक झाली. मात्र, अधिकृत नळधारक केवळ सुमारे ३५ हजारच आहेत. शिवाय, तीन कोटीचा पाणीकर थकीत आहे. असेच सुरू राहिल्यास अनधिकृत नळधारकांची संख्या पुन्हा वाढू शकते. त्यामुळे अमृत पाणी पुरवठा योजनेला गती देऊन तात्काळ कार्यान्वित करणे, हाच मनपासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

चंद्रपूर शहराला इरई धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या दरवर्षी वाढत असल्याने पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे महानगरपालिकेसाठी आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे शासनपुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) ही महत्त्वाकांक्षी योजना तातडीने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. या योजनेत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, मलनि:सारण, नागरी परिवहन पुरवणे, गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून राहणीमानाचा दर्जा सुधारणे, प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, स्वच्छतेकरिता मलनि:सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्य जलवाहिनीची व्यवस्था या कामाचा समावेश आहे. परंतु, अन्य कामाच्या तुलनेत पाणीपुरवठा योजनेला प्रथम प्राधान्य देण्यासाठी अमृत योजनेला गती देऊन कार्यान्वित करणे हाच चांगला पर्याय आहे. कारण, घरांची संख्या ८२ हजार असली तरी अधिकृत नळधारक केवळ ३५ हजाराच्या जवळपास आहे.

अनधिकृत नळांना आळा

चंद्रपूर शहरातील घरांच्या संख्येत शहरात अधिकृत नळधारकांची संख्या कमी आहे. मात्र, कोणत्याही वॉर्डात अनधिकृत नळ नाहीत, असा दावा महानगरपालिकेने केला आहे. घरी नसलेले अनेक कुटुंब सार्वजनिक नळातील पाणी वापरतात. अमृत योजनेमुळे १०० टक्के घरांमध्ये अधिकृत नळ सुरू होणार आहेत, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.

जलवाहिन्यातील अत्यल्प पाणी गळती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलवाहिन्यांची काही महिन्यापूर्वीच तपासणी व दुरुस्ती करण्यात आली. तपासणीचे काम तर नियमितपणे सुरूच असते. त्यामुळे पाणी गळती अत्यल्प आहे. कुठे समस्या निर्माण झालीच तर लगेच दुरुस्ती केली जाते.

तीन कोटीचा पाणीकर थकीत

नागरिकांनी पाणीकर भरावा, यासाठी मनपाकडून सातत्याने सूचना दिल्या जातात. त्यामुळे कर भरण्यात सामान्य कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत आहे. परंतु, व्यावसायिक श्रेणीतील नळधारकांचे दुर्लक्ष झाले. अशा नळधारकांकडे तीन कोटीचा पाणीकर थकीत आहे.

कोट

अमृत योजनेचे काम झपाट्याने सुरू असल्याने लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, यासाठी शहरातील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे अधिकृत नळधारकांची संख्या निश्चितच वाढेल आणि १०० टक्के घरांना नळजोडणी होईल.

- विजय बोरीकर, अभियंता पाणीपुरवठा मनपा, चंद्रपूर