शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

गांधी स्मारकासाठी ७५ वर्षीय शिक्षकाचा लढा

By admin | Updated: October 15, 2016 01:01 IST

सावली गावाला फार पुर्वीपासून ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे. या गावात अनेक राजकीय नेते, तसेच अनेक थोर नेत्यांनी भेट दिली आहे.

लोकप्रतिनिधींना निवेदन : गडचिरोली ते सावली पदयात्राप्रकाश लोनबले सावलीसावली गावाला फार पुर्वीपासून ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे. या गावात अनेक राजकीय नेते, तसेच अनेक थोर नेत्यांनी भेट दिली आहे. त्यातीलच एक म्हणजे महात्मा गांधी यांनी सावली गावात दोनदा भेट दिली. तसेच गावात मुक्कामीसुदधा राहीले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिला गांधीग्राम म्हणून ओळखावे, व म. गांधीचे राष्ट्रीय स्मारक सावलीत उभारण्यात यावे, यासाठी येथील ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर गाडेवार हे प्रयत्न करत आहेत. मात्र त्याच्या लढ्याला अजूनही यश आले नाही. सावलीला गांधी ग्राम म्हणून ओळखण्यात यावे, यासाठी सुधाकर गाडेवार यांच्या नेतृत्वात दोन वर्षापूर्वी गडचिरोली ते सावली अशी पदयात्रा काढली. तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अहिर, खा. नेते यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. मात्र अजूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा गांधीग्राम बनविण्याचा व राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी लढा सुरु आहे.म. गांधीची सावलीला प्रथम भेट १४ नोव्हेंबर १९३३ रोजी व द्वितीय भेट २७ फेब्रुवारी १९३६ साली झाली. या काळात सावलीत सुतकताई, सुतापासून खादीचे कपडे बनविण्याचा व्यवसाय सुरु होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी म. गांधीनी स्वदेशीचा वापर व विदेशी वस्तूचा त्याग हा मंत्र दिला होता. सावलीत खादीचे कापड तयार होत असल्याने ग्राम स्वराज्य कल्पनेप्रमाणेच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सावलीत नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने १९२७ ला खादी भांडार केंद्र सुरु झाले. त्यावेळी अवस्थी याच खादी भांडाराच्या पहिल्या व्यवस्थापक बनल्या. यावेळी खादी भांडारचे व्यवस्थापन, विपणन, उत्पादन, विक्री, याची माहिती गांधीजीना वेळोवेळी कळविली जात होती. यांची पाहणी करण्यासाठी व कामगारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी १४ नोव्हेंबर १९३३ ला गांधीजी सावलीत आले. यावेळी खादी गांधी सेवा संघाचे अधिवेशन निश्चित करण्यात आले. खादी गांधी सेवा संघाचे अधिवेशन २६ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३६ पर्यंत चालले. डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनलाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशिला नायर आदी महान नेते उपस्थित होते. या काळातच पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पत्नी कमला नेहरु याचे निधन झाल्याने अधिवेशन समाप्त करण्यात आले. असा इतिहास सावलीला लाभला आहे. त्यामुळे सावलीला गांधीग्राम म्हणून ओळखण्यात यावे, व म. गांधीचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात यावे, यासाठी सुधाकर गाडेवार व त्याचे सहकारी यांचा लढा सुरुच आहे.हा लढा यशस्वी होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.