शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकवाहिनीचा ७० वर्षांचा निरंतर प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:12 IST

‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे.

ठळक मुद्देखासगी वाहतुकीच्या आक्रमणानंतरही अस्तित्व कायम

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे. महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जात असल्याने आजच्या खासगी वाहतुकीच्या स्पर्धेतही महामंडळाची लालपरी लोकवाहिनी चांगलाच तग धरत सोबतीला शिवशाही बससह ७० वर्षांनंतरही निरंतर सेवा देत आहे.१ जून १९४८ मध्ये राज्य शासनाने परिवहन खात्यातंर्गत प्रवाशी वाहतूक सेवा सुरू केली आहे. पहिली बस सेवा पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत ही सेवा प्रवाशांना सुरक्षित आपल्या स्थळी पोहचवित आहे. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे.महामंडळाच्या सेवेत खासगी प्रवाशी वाहतूक अडथळा ठरत आहे. खासगी वाहने आकर्षक व आरामदायक आहे. विशेष म्हणजे, कमी वेळेत जाण्यासाठी अनेक प्रवाशी आकर्षित होत आहेत. हा प्रवास शहरी भागात बºयापैकी सुरु आहे. या खासगी वाहतुकीच्या तोडीसाठी एस. टी. महामंडळानेही शिवशाही बसचा ताफा लालपरीच्या दिमतीला आणला आहे. समाजातील ३३ विविध घटकांना प्रवास भाड्यात १० ते १०० टक्के सवलत देण्यात येते. त्याचप्रमाणे त्रैमासिक पास, आवडेल तिथे प्रवास योजना सवलतीच्या दरात दिली जाते. मात्र बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तिकीट, संगणकीय प्रणाली, संगणकीय आरक्षण प्रणाली, मोबाईल आरक्षण, वाय-फाय आदी सेवा सुरू केल्या आहेत. अपघात सहायता निधी अंतर्गत अपघातात दुर्देवाने प्रवाशी मृत झाल्यास १० लाख रुपये तर जखमींना पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. या सर्व सवलतीमुळे एस.टी. आजही ग्रामीण भागात सर्वांची आवडती आहे. एस.टी.ने आज पूर्ण महाराष्ट्रातील मार्ग व्यापले आहेत.ग्रामीण भागात भरवशाची सेवाग्रामीण भागातील प्रवाशांची गरज भागवते ती लोकवाहिनी. त्यामुळे ग्रामीण भागात एस टी. ला जीवन वाहिनी संबोधले जाते. महामंडळाकडून प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्राच्या प्रगतीत महामंडळाचा सिहांचा वाटा आहे.