शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

मूल तालुक्यात रोहयोच्या कामांवर राबतात ७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:12 IST

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे४४ ग्रामपंचायतीअंतर्गत कामांना सुरुवात : पाच गावांना कामाची प्रतीक्षा

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे मूल तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे ७ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर ५ ग्रामपंचायतीमध्ये अद्यापही कामाला सुरूवात झालेली नसल्याने या गावातील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत.प्रत्येक मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. या योजने अंतर्गत मूल तालुक्यातील ४९ गावांपैकी ४४ गावात विविध कामांना सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ७ हजार मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र तालुक्यातील चिमढा, आकापूर, काटवण, उथळपेठ आणि टेकाडी येथे अजुनही कामांना सुरूवात झाली नसल्याने तेथील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे सावट आहे. यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगारासाठी इतरत्र स्थलांतरीत होत असताना रोहयोच्या कामांमुळे आधार मिळाला आहे.मूल पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यात १७० कामे सुरू असून यामध्ये पांदण रस्ते ११, बोडी खोलीकरण ११, तलाव ५, नाला सरळीकरण ४, विहीर ८, शौचालय ९, घरकूल १०७, सिमेंट काँक्रीट रस्ता १ आणि वृक्षलागवडीच १४ कामे सुरू असून २५ एप्रिलपर्यंत ४ हजार १३१ मजूर कामावर होते. यानंतर चितेगाव, गडीसुर्ला, जुनासुर्ला, मरेगाव, मुरमाडी, उश्राळा येथे पांदण रस्ता, तलाव, घरकूल व इतर कामे सुरू करण्यात आले असून या ठिकाणी २ हजारच्या जवळपास मजूर कामावर आहेत. तालुक्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून उर्वरीत ५ ग्रामपंचायतीमध्येही कामांना सुरूवात करावी, अशी अपेक्षा मजुरांनी केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका कार्यक्रम अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी लक्ष ठेवून आहेत.मजुरांना शासनाच्या सुविधागावापासून ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्यास १० टक्के जास्त मजुरी राज्य शासनामार्फत, कामावर पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार व बरोबर आणलेल्या ६ वर्षाखालील लहान मुलांना सांभाळण्याची सोय, कामाच्या अनुषंगाने मजुरास किंवा बरोबर आणलेल्या लहान मुलास दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्णसेवा शासकीय खर्चाने व दैनिक मजुरीच्या ५० टक्केपर्यंत सानुग्रह रुग्ण भत्ता, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास ५० हजार रूपयांपर्यंत सानुग्रह अनुदान रोहयो योजनेतून दिले जात आहे. त्यामुळे कामांवर मजुरांची संख्या वाढली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ५ गावात कामे सुरू झालेली नसून या गावांमध्येही लवकरच कामांना सुरूवात केली जाईल.- एस. जी. पुरीतालुका कार्यक्रम अधिकारी तथा प्रभारी संवर्ग विकास अधिकारी .