शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस

By admin | Updated: June 28, 2014 23:28 IST

वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली.

केवळ १५ टक्के पेरण्या आटोपल्या : जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुष्काळाचे सावटचंद्रपूर : वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र त्याचीही टक्केवारी केवळ १५ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अद्याप पिकाला पोषक अशा पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. १ जून ते २८ जूनपर्यंत पडलेला पाऊस असा आहे. चंद्रपूर ८९.३० मि.मी., बल्लारपूर ५४.८० मि.मी., गोंडपिपरी ६५.६८ मि.मी., पोंभुर्णा २५.५ मि.मी., मूल ५०.२२ मि.मी., सावली ९६.२५ मि.मी., वरोरा १४७.४४ मि.मी., भद्रावती ३८.०० मि.मी., चिमूर ३६.२० मि.मी., ब्रह्मपुुरी ६८.३० मि.मी., सिंदेवाही ७५.८६ मि.मी., नागभीड ३९.७० मि.मी., राजुरा २.७ मि.मी., कोरपना ३७.१० मि.मी., तर जिवती तालुक्यात ७६.२९ मि.मी. पाऊस पडला.जिल्ह्यात सर्वाधिक १४७.४४ मि.मी. पाऊस वरोरा तालुक्यात कोसळला तर सर्वात कमी २.७ मि.मी पाऊस राजुरा तालुक्यात कोसळला. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सारे गणित पावसावरच अवलंबून असते. मात्र यंदा महिना लोटूनही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. (प्रतिनिधी)