शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस

By admin | Updated: June 28, 2014 23:28 IST

वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली.

केवळ १५ टक्के पेरण्या आटोपल्या : जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुष्काळाचे सावटचंद्रपूर : वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र त्याचीही टक्केवारी केवळ १५ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अद्याप पिकाला पोषक अशा पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. १ जून ते २८ जूनपर्यंत पडलेला पाऊस असा आहे. चंद्रपूर ८९.३० मि.मी., बल्लारपूर ५४.८० मि.मी., गोंडपिपरी ६५.६८ मि.मी., पोंभुर्णा २५.५ मि.मी., मूल ५०.२२ मि.मी., सावली ९६.२५ मि.मी., वरोरा १४७.४४ मि.मी., भद्रावती ३८.०० मि.मी., चिमूर ३६.२० मि.मी., ब्रह्मपुुरी ६८.३० मि.मी., सिंदेवाही ७५.८६ मि.मी., नागभीड ३९.७० मि.मी., राजुरा २.७ मि.मी., कोरपना ३७.१० मि.मी., तर जिवती तालुक्यात ७६.२९ मि.मी. पाऊस पडला.जिल्ह्यात सर्वाधिक १४७.४४ मि.मी. पाऊस वरोरा तालुक्यात कोसळला तर सर्वात कमी २.७ मि.मी पाऊस राजुरा तालुक्यात कोसळला. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सारे गणित पावसावरच अवलंबून असते. मात्र यंदा महिना लोटूनही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. (प्रतिनिधी)