शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

६५ उंबरठ्यांचे गाव सोयीसुविधांपासून वंचित

By admin | Updated: August 30, 2015 00:39 IST

तालुक्यात शेवटच्या टोकावर ६५ उंबरठ्यांचे आसेगाव नावाचे गाव आहे. आदिवासी पाडा गिलबिली गट ग्रामपंचायतीत असून सरकारी सर्वेक्षणाचा फटका येथील नागरिकांना बसला आहे....

आसेगावची व्यथा : सरकारी सर्वेक्षणाचा आदिवासींना फटकाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरतालुक्यात शेवटच्या टोकावर ६५ उंबरठ्यांचे आसेगाव नावाचे गाव आहे. आदिवासी पाडा गिलबिली गट ग्रामपंचायतीत असून सरकारी सर्वेक्षणाचा फटका येथील नागरिकांना बसला आहे. येथे दारिद़्र्य रेषेखालील सर्वेक्षणात केवळ सात उंबरठ्यांचा समावेश करण्यात आला. परिणामी शासनाच्या इंदिरा आवास योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. यामुळे आज घडीला आसेगाव मूलभूत सोयीसुविधांपासून नागरिक वंचित आहेत. तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीमध्ये आसेगाव व मोहाडी तुकूम ही गावे समाविष्ट आहेत. येथे एकूण लोकसंख्या एक हजार ६७१ इतकी आहे. यामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या १ हजार ३५० आहे. ८० टक्के आदिवासी बांधव वास्तव्याला असूनही त्यांच्या सर्वेक्षणात सरकारी यंत्रणेने गफलत केली. यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळत नाही. हलाखीच्या परिस्थितीमुळे आसेगावात अनेकांच्या घरांची पडझड झाली. संसार उघड्यावर आले आहेत. दारिद्र्य रेषेखालील यादीत नसल्याने इंदिरा आवास योजनेतील घरकुलाचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे.शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सन २००२-०७ वर्षातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सर्वचस्तरातील योजनेचा लाभ देण्यात येतो. याला अपवाद मात्र आसेगाव ठरले आहे. बीपीएल कुटुंब नाममात्र ठरविण्यात आल्याने शासनाच्या विविध योजनेचा लाभ येथील नागरिकांना घेता येत नाही. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षातही आदिवासींवर अन्यायाचे धोरण जाणिवपूर्वक लादण्यात आल्याची भावना येथील नागरिकांत व्यक्त केली जात आहे. निवडणुकीतील प्रचारादरम्यान नेत्यांनी नागरिकांना आश्वासने दिली. मतांचा जोगव्यासाठी आदिवासी समाज बांधवांना भ्रमित करण्यात आले. मात्र त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यास आजतागायत कोणीही पुढाकार घेतला नाही. जुनोना-पोंभूर्णा मार्गावरील आसेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी याच इमारती सुस्थितीत आहेत. मात्र अंतर्गत घराची पडझड झाली आहे. येथे बोटावर मोजण्या इतपत लोक शेती करतात. अनेकांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. नेहमीच हाताला काम मिळते असे नाही. तुटपुंज्या मजुरीवर संसाराचा गाडा चालवावा लागतो. अशातच कित्येक वर्षापासून तग धरून असलेले निवारे मोडकळीत आले. घराची डागडुजी करण्या इतपत पुंजी नाही. घरकुलाच्या योजनेचा लाभही नाही, अशी अवस्था येथील आदिवासी कुटुंबांची झाली आहे. याला कारणीभूत दारिद्र्य रेषेखालील २००२-०७ सालची जनगणना ठरली आहे.आदिवासींचे गाव असूनही दारूबंदीबल्लारपूर तालुक्यात आसेगाव १०० टक्के आदिवासी पाडा आहे. समाजात समाजाची गणना व्यसनी म्हणून केली जाते. संस्कृतीचा वसा म्हणून याकडे पाहण्यात येते. मात्र येथील तरुणांनी आदर्श निर्माण केला आहे. गावात कोणालाही दारूचा व्यवसाय करू दिला जात नाही. यामुळे गावात तंट्याचे प्रमाण कमी आहे. गावात शिक्षणाबद्दलची उदासीनता दिसत असली तरी याला कारणीभूत प्रतिकूल परिस्थिती आहे. शतप्रतिशत आदिवासींचे गाव असूनही दारूबंदी असल्याने नवा आदर्श निर्माण करण्याकडे गावकऱ्यांची वाटचाल प्रेरणा देणारी आहे. आदिवासींचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी शासकीय पातळीवरील यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.गावकऱ्यांना घरकुलाची प्रतीक्षाआसेगावात एकूण ६५ आदिवासी कुटुंब वास्तव्याला आहेत. यातील केवळ सात कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. सन २००२-०७ च्या बीपीएल सर्वेक्षण गावातील नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरले. सदोष सर्वेक्षणामुळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना एक लाख रुपये किमतीचे इंदिरा आवास योजनेतील घरकुलाच्या लाभापासून कित्येक वर्षापासून वंचित आहेत. जातीनिहाय आर्थिक जणगणनेचा सोपस्कार पार पडला आहे. यादीचे प्रकाशन अजून बाकी आहे. निवारा कमकुवत झालेल्या नागरिकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे.